Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१

वाघाच्या हल्ल्यात केळझर येथिल दोन बैल ठार

वाघाच्या हल्ल्यात केळझर येथिल दोन बैल ठार




मूल - तालुक्याच्या केळझर येथिल रवींद्र कवठे यांच्या मालकीचे दोन बैलाना वाघाने ठार केल्याची घटना काल रात्रौच्या सुमारास घडली.
रवींद्र कवठे यांनी गावाला लागूनच असलेल्या स्वतःच्या शेतात रवींद्र कवठे या शेतकऱ्याने तीन बैलांना बांधून ठेवले होते. मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने काल रात्रौच्या सुमारास दोन बैलांना हल्ला करून जागीच ठार केले तर एक बैल दोर तोडून पडाला. सकाळी शेतकरी शेतात गेला असता ही घटना लक्षात आली.  रवींद्र कवठे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनेचा पंचनामा करीत आहे.
         या घटनेने केळझर गावात वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.