Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २२, २०२०

राजुरा तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना धान्य सुरू करा : घनशाम मेश्राम यांची मागणी



राजुरा/ प्रतिनिधी

राजुरा तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य सुरू करावे अशी मागणी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी तहसीलदार राजुरा यांचेकडे निवेदनातून केली आहे. 

कोरोना चे महामारित अनेकांचे रोजगार बुडाले असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची प्रचंड नुकसान झाली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तसेच नवीन राशन कार्ड साठी अर्ज केलेल्या व्यक्तींचे आठ दिवसात अर्ज निकाली काढून त्यांना राशन कार्ड देण्यात यावे जेणेकरून तहसील मध्ये जण्यायेण्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड बसणार नाही असेही निवेदनात मेश्राम यांनी नमूद केले आहे. 

चूनाला, विहीरगाव, बामन वाडा, राजुरा, सतरी, चनाखा, पंचाला, सिंधी, नलफडी, मूर्ती, कोहापरा, धानोरा, बेरडी, सोंडो, विरुर, साखरी, सुमठणा, हिरापुर, वरझडी, नोकारी, बैलंपुर, भेंडाला, खांबाडा,  या गावातील गरजू नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य सुरू करावे अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.