Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १७, २०२०

मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधी मृत्युने कवटाळले




गजेंद्र डोंगरे/बाजारगाव
येथून ५ किमी अंतरावर असलेल्या गरमसूर येथे राहणारे उकंडराव गोविंदराव राठोड ( ४४) यांना दोन मुली व १मुलगा व पत्नी असा आनंदी परिवार , एकीकडे संपुर्ण भारतवासी १५ आॅगस्ट चा राष्ट्रीय सन साजरा करीत असतांना राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.



सविस्तर घटना अशी की दि १५/८/२०२० ला सकाळी उकंडराव राठोड हे आपल्या दुचाकी क्र. एम. एच. २७ बी. इ. ३९७०ने जवळच असलेल्या काथलाबोडी येथे काही कामा निमित्त गेले व परत येत असतांना स्टार की पाइंट रिसोर्ट समोर विरूद्ध दिशेने येणा-या पिकअप गाडी क्र.एम.एच.४० बी. एल. ६९६७ ने जोरात धडक दिली, त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वाटेतच प्राणज्योत मालवली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
एकीकडे लाडात वाढविलेल्या दोन मुली व १मुलगा नावे किरण(२३), व आरती (२२) या दोन्ही मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करू हा आनंद मनात असतांना कोराना आजार असल्याने ते लग्न पुढील वर्षी करू म्हणून ६मे ला होणारा लग्नोत्सव् पुढे राबविला परंतु तो आनंद नियतीला मान्य नव्हता , व काल दि १५/८ला अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले १मुलगा केलटेक्स कंम्पनीत काम करतो त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी व एकीकडे वडीलांचे अपघाती निधन यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य दु:खाच्या गर्तेत आहेत

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.