Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २०, २०१९

मायणी तलाव वनराईत चंदन चोरीला उधाण




मुख्य गेट पासून शंभर मीटरअंतरावरील चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड : सुरक्षा रामभरोसे 


मायणी :-ता. खटाव जि. सातारा
येथील मायणी ब्रिटिशकालीन तलावाच्या सभोतली असणाऱ्या वनराईतील रक्तचंदनाच्या झाडाची बेधडक पणे तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वनराईत प्रवेश करून तलावाकडे जाण्यासाठी मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य गेट पासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील ही चंदनाची झाडे तोडण्यात आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

         यंदा तलावात पाणी आल्याने सर्वत्र हिरवळ पसरली आहे,यामुळे तलावातील सभोवताली असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात असंख्य प्रकारची गर्द झाडी पहावयास मिळत आहे. यामध्ये रक्तचंदनाच्या झाडांचाही समावेश आहे . 

         गेल्या काही वर्षापासून थंडावलेल्या रक्तचंदन झाडांच्या चोऱ्यानी पुन्हा एकदा डोके वर काढले का काय ? ही भीती वर्तवली जात आहे. तलावास व वनराईस नसलेली सुरक्षा यास जबाबदार आहे का? कोणाच्या आशीर्वादाने निर्धास्त चंदन चोरीचे धाडस चोरटे करीत आहेत .याची चौकशी होणे आवश्यक आहे.
         हिरवळ पानाफुलांनी बहरनाऱ्या चंदनाच्या झाडाची कुठे कत्तल तर कोठे झाडांवर अर्धवट कुऱ्हाड चालवल्याने ही झाडे सुकून जाऊ लागली आहेत. यास जबाबदार कोण ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.