Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ३०, २०१९

कर्मचाऱ्यांना योग्य वेळेत वेतन अदा करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन निर्णयांची अंमलबजावणी

नागपूर/प्रतिनिधी:


कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

महावितरणने पदोन्नती किंवा बदलीने रुजू झालेल्या, कार्यमुक्त झालेल्या, निलंबित असलेल्या, नव्याने रुजू होणाऱ्या, अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले असून अशा प्रकारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेळेत वेतन अदा करण्यासाठी परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केले आहेत.

 या परिपत्रकानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी कंपनीच्या संचालक मंडळाशी सल्लामसलत करून कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने कंपनीत नव्याने रुजू होणा-या प्रत्येक कर्मचा-याला महिन्याच्या 1 ते 15 तारखेदरम्यान रुजू करुण घेण्यात येऊन संबंधित कर्मचा-याला त्वरीत भविष्य निर्वाह निधी क्रमांक देऊन त्याला त्याच महिन्यात वेतन देण्यात यावे. या निर्णयामुळे विव्दिह कायद्या अंतर्गत जमा करावयाची रक्कम निर्धारीत कार्यालयांना जमा करने शक्य होणार आहे.

कर्मचा-यांचे मासिक पगार वेळेवर होण्यासाठी पदोन्नती अथवा बदली झालेल्या सर्व कर्मचा-यांना त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्यमुक्त करण्यात यावे, या निर्णयामुळे कर्मचा-यांची बदली होण्यापुर्वीच्या कार्यालयात त्याचा नियमित पगार अदा करण्यात येईल व नवीन कार्यालयात देखील कर्मचारी रुजू झाल्यावर त्याचा नियमित पगार वेळीच देणे शक्य होणार आहे. याशिवाय संबंधित कर्मचा-याच्या कार्यमुक्तीच्या आदेशामध्ये त्याची वेतनश्रेणी, मुळ पगार, घरभाडे भत्ता याची पुर्ण माहिती दिल्या जाईल यामुळे नवीन कार्यालयात रुजू होतेवेळी ही सर्व माहिती संबंधीत कर्मचा-याच्या नवीन कार्यालयात सहजरित्या उपलब्ध होईल.  

       अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या परिपत्रकानुसार दिलासा देण्यात आला असून कंपनीच्या सेवेत असतांना निलंबीत झालेल्या कर्मचा-यांना निलंबन कालावधी दरम्यान देय असलेल्या निलंबन भत्त्यातून त्याच्या भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा वजा करून ती रक्कम भविष्य निर्वाह निधी आणि पेंशन निधीत निर्धारीत कालावधीत जमा करण्यात यावी, यासाठी संबंधित कर्मचा-याला निलंबन भत्ता प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपुर्वी अदा करण्याच्या सुचना सर्व संबंधित विभागांना या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.

       महावितरणच्या या परिपत्रकामुळे कर्मचा-यांना पगार वेळीच मिळण्यात मदत होणार असून भविष्य निर्वाह निधीचा भरणा वेळीच होऊन भविष्य निर्वाह निधीचा भरणा उशीराने झाल्याने भरावयास लाग़णारा व्याज आणि दंड टाळता येणार आहे.

 महावितरणच्या या परिपत्रकामुळे अनेक कामगार संघटना आणि कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले असून राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणिय ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी कर्मचा-यांच्या हितार्थ घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.