Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

10 जणांनी घेतले उमेदवारीसाठी अर्ज

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशी एकही अर्ज नाही


चंद्रपूर, दि.19 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात काल दिनांक 18 मार्चपासून सुरुवात झाली असून  आज दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
      
     चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रे 18 मार्च 2019 ते 25 मार्च 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर  यांच्याकडे दाखल करता येणार आहे.
            आज दिनांक 19 मार्च ला 10 व्यक्तींनी उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक कार्यालयातून प्राप्त केली आहेत. काल 7 व्यक्तिंनी 11 अर्ज प्राप्त केले होते. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आज उमेदवारी अर्ज प्राप्त करणाऱ्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुंडलिक गोठे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नितेश डोंगरे, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ राऊत, वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत सोनुले, बहुजन रीपब्लिक सोशालीस्ट पार्टीचे भूपेंद्र रायपुरे आणि राजू झोडे, बहुजन समाज पार्टीचे भिमेंद्र कांबळे, अपक्ष म्हणून नामदेव किन्नाके, शैलेश जुमडे, प्रफुल पुलगमकर यांनी नामनिर्देशन अर्जाची उचल केली आहे.
             अर्ज दाखल करण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम आवश्यक असून अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम साडेबारा हजार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षातून हा अर्ज विनामुल्य उपलब्ध करण्यात येतो. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारांसह पाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात असेल. 18 मार्च ते 25 मार्च या काळातील सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच हा अर्ज दाखल करता येईल.
नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे असेल त्यांना 28 मार्च 2019 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज सादर करता येईल. 11 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक घेतली जाणार आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.