Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०८, २०१९

महावितरणच्या कार्यालयांची संख्या वाढणार

नागपूर/प्रतिनिधी:
पुनर्ररचनेमुळे राज्यात ४६ नवीन उपविभाग कार्यालये आणि ९२ शाखा कार्यालये सुरु होणार 
ग्राहक तक्रारी आणि वीज बिल वसुलीसाठी वेगळे पथक राहणार 
महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मणुष्यबळ पुनर्ररचना कार्यक्रमात कर्मचा-यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनातून भीती काढून टाकावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांनी आज नागपूर येथे आयोजित अधिकारी आणि कर्मचारी मेळाव्यात केले. 

महावितरणमध्ये पुढील महिन्यापासून पुनर्ररचना कार्यक्रमाची टप्प्याटप्याने अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी काटोल रोड येथील विदुयत भवनातील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी संचालक रेशमे यांनी गुरुवारी (दि. ८ मार्च) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी बोलताना रेशमे पुढे म्हणाले कि, महावितरणची पुनर्ररचना वीज ग्राहक आणि कर्मऱ्यांच्या हितावह असून पुनर्ररचनेमुळे राज्यात ४६ नवीन उपविभाग कार्यालये आणि ९२ शाखा कार्यालये सुरु होणार आहेत. शाखा आणि उपविभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी वर्गाला सध्या अनेक प्रकारची काम करावी लागतात. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण येतो आहे. महावितरण प्रशासनकडून याची दखल घेत मणूष्यबळ पुनर्ररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या रचनेत ग्राहक तक्रारी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी मोठ्या शहरी भागात उपविभागीय पातळीवर वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार असून वीज बिल वसुलीसाठी वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. 

वीज ग्राहकांच्या तक्रारीची दखल शाखा कार्यालयात घेतल्या जाते मात्र नव्या रचनेत उपविभागीय पातळीवरून या तक्रारीची दखल घेऊन ती सोडवल्या जाणार आहे. परिणामी जनमित्रांचा कामाचा ताण कमी होणार आहे. याशिवाय उपकेंद्राची आणि वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विभागीय पातळीवर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात पथक कार्यरत राहणार आहे. या पुनर्रचनेमुळे काही ठिकाणी कर्मचारी अतिरिक्त होणार असले तरी त्याला जवळच्या विभागात अथवा मंडल कार्यालयात समायोजित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. सोबतच काही ठिकाणी नवीन शाखा आणि उपविभागीय कार्यालये सुरु होणार असल्याने अतिरिक्त कर्मचा-यांचे तेथेही समायोजन करणे शक्य आहे. अश्या अधिकारी-कर्मचाऱयांची सेवा जेष्ठता किंवा घटनादत्त आरक्षणास धक्का लागणार नाही असेही रेशमे यांनी स्पष्ट केले. 

यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, हरीश गजबे, बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दीपाली माडेलवार, अमित परांजपे, प्रफुल लांडे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधान) वैभव थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.