Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

नागभिड परिसरात वादळी पावसासह गारपिट

कौलारु घरांची पडझड

चंद्रपूर / प्रतिनिधी

पावसाला सुरुवात होवुन अचानक गारपीट सुरु झाली, परिसरातील मौशी, ढोरपा, ईरव्हा, टेकरी,बालापुर, पाहार्णी, विलम,म्हसली, तेली मेंढा, देवटेक, चिकमारा, कालेता, नान्होरी अशा अनेक गावातील मजुर कोणी रस्त्यात तर कुणी शेतात सापडल्याने अनेकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येथे उपचारास पाठवण्यात आले. गारपिटीसोबत वादळी पावुस असल्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली. अनेक पक्षी मृत्यु मुखी पडले. ईतर जिवीत हानी जरी झाली नसली तरी शेतातील गहु, चना, मुंग, जवस, तुळी, जमीनदोस्त झाले असुन यासारख्या रबी पिकाची शंभर टक्केनुसकान झाली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अनेकांना रात्र जागुन काढावी लागली. आता शासनाकडुन चौकशी होवुन भरपाई कशी मीळेल या प्रयत्नात शेतकरी शेतमजुर असुन संबंधित तलाठी यांनी प्रत्यक्ष पहाणी केली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.