Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

आनंदवन चौकात तीन ठार

वरोरा /प्रतिनिधी

चंद्रपूर - नागपूर महामार्ग वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो दिनांक १६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आनंदवन चौकातील चौफुली वर नागपूर वरून येणाऱ्या भरधाव ट्रॅकने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी स्वार, त्याची पत्नी व मुलगी यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूर नागपूर हा महामार्ग अतिशय व्यस्त महामार्ग असून शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान बोर्डा येथील ईश्वर भास्कर मिलमीले ( वय ४५), पत्नी अलका ईश्वर मिलमिले ( वय ३४) व मुलगी समृद्धी मिलमिले ( वय ७) हे प्रकृती डॉक्टरांकडे दाखवण्याकरिता आपल्या दुचाएच 34 के डब्लू 4163 क्रमांकाच्या दुचाकीने  वरोऱ्याच्या दिशेने जात असताना अचानक मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिली.

धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी स्वार व त्याचे दुचाकीवरील सहकारी खाली पडल्याने ट्रकच्या समोरचा चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अल्का व समृद्धी हिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी स्वार ईश्वर हा गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला असून या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.