Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पुरस्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरस्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जून १९, २०१८

सत्यपाल महाराजांना प्रबोधनकार पुरस्कार

सत्यपाल महाराजांना प्रबोधनकार पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:
मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे पुरस्कारासाठी यंदा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक कार्य केले त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाउंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो. समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या बाबींचा नायनाट करण्यासाठी लोकजागृती करणारे सत्यपाल महाराज यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापूर्वी (स्व.) डॉ. भा. ल. भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, रामकृष्णदादा बेलूरकर, शरद जोशी, डॉ़ सदानंद मोरे, अॅड. मा. म. गडकरी, गिरीश कुबेर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार प्रदान समारंभ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबर २०१८ रोजी नगपुरात होणार आहे.

शुक्रवार, मे ०४, २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील अनुसूचित जाती –जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी व्यक्ती व संस्थांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार योजना सन 2018-19 शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 मे 2018 पर्यत शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अंपग,कुष्ठरोगी इत्यादीच्या विकासासाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय निर्मूलन,अंधश्रध्दा रुढी निर्मूलन व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.या योजनेनुसार व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातेा.
या योजनेनुसार अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक असावेत व त्यांनी सामाजिक क्षेत्रात कमीम कमी 10 वर्षे काम केलेले असावे.प्रस्ताव सादर करतांना अशा सामाजिक कार्यकर्ऱ्याचे वय 24 मे 2018 रोजी 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त व स्त्रियांसाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.अपवादात्मक परिस्थितीत वय शिथील करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्ती केलेल्या समितीकडे राहतील.जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्यविषयक दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,फोटो व केलेल्या कार्याविषयी माहिती प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा.यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.सदर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही,असे सहायक आयुक्त,समाजकल्याण, विभाग चंद्रपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्कारासंबधी अधिक माहिती व अजाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण,विभाग चंद्रपूर यांचे कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.

गुरुवार, जानेवारी २५, २०१८

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार

पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय, राणी बंग यांना पद्मश्री
नवी दिल्ली /ऑनलाईन काव्यशिल्प:                विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
                      प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात बंग दाम्पत्यालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे गडचिरोलीतील दुर्गम भागांत वैद्यकीय सेवा देणाऱ्या या दाम्पत्याचा हा उचित सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
डॉ. अभय बंग यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तीन विषयांत सुवर्णपदक मिळवल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातही सुवर्णपदक मिळवले. शहरातील ऐशो आराम आणि भौतिक सुखांचा त्याग करून त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात आपले कार्यक्षेत्र निवडले. 
डॉ. राणी चारी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर पती-पत्नी दोघांनी गडचिरोलीत समाजकार्याला वाहून घेतले. गडचिरोलीत त्यांनी बालमृत्यू रोखण्यसाठी केलेल्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बंग दाम्पत्याने महिलांचे आरोग्य दारूबंदी या विषयांवरही काम केले आहे.
                  केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील काही जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.

सोमवार, जानेवारी ०८, २०१८

 मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा

मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा

Baba Amte Humanity Award to Matin Bhosale | मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळाचंद्रपूर/प्रतिनिधी:  

 यावर्षीचा कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार मतीन भोसले यांना तर साधनाताई आमटे समीधा पुरस्कार हा शुभदा देशमुख यांना बहाल करण्यात आला. आनंदवन चौकातील ज्ञानदा जीवन विकास केंद्र परिसरात रविवारी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तथा लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरचे संचालक डॉ. हरीश वरभे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रयास सेवांकूर संस्था अमरावतीचे संस्थापक डॉ.अविनाश सावजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार गोवा स्वातंत्र संग्राम सैनिक श्रीधर पद्मावार प्रायोजित असून यामध्ये ५१ हजार रुपये रोख, मानपत्र असलेला पुरस्कार यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाण गावात पारधी समाजातील मुलांकरिता आश्रमशाळा काढून शाळेची यशस्वी वाटचाल करणारे मतीन भोसले यांना प्रदान करण्यात आला.
याचवेळी साधनाताई आमटे समीधा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कुरेखडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या सहसंस्थापिका शुभदा देशमुख यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख व मानपत्र होते. याप्रसंगी प्रा. म. घो. उपलेंचवार लिखित मानपत्राचे वाचन ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी प्राचार्य गजानन लोनबले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक माजी विद्यार्थी दिलीप अग्रवाल यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश महाकाळकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. श्रीराम महाकरकर यांनी मानले. सुचेता पद्मावार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. साधनाताई आमटे समीधा पुरस्कार भारत जोडोचे गिरीष पद्मावार यांनी प्रायोजित केला.

सोमवार, डिसेंबर ०४, २०१७

अविनाश पोईनकर यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज वाड:मय पुरस्कार

अविनाश पोईनकर यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज वाड:मय पुरस्कार

चंद्रपूर/ प्रतीनिधी :
कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रतिथयश कवी अविनाश पोईनकर यांच्या 'उजेड मागणारी आसवे' या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज उत्कृष्ठ वाड:मय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी संस्कृत विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.पंकज चांदे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सुधाकर मोगलेवार, डॉ.बळवंत भोयर, आचार्य ना.गो.थुटे, मेजर हेमंत धकाते उपस्थित होते. अविनाश पोईनकर यांचा 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक डॉ.किशोर सानप यांची प्रस्तावना व पहिले युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांचे ब्लर्ब या कवितासंग्रहाला आहे. राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश पोईनकर यांचे अक्षर साहित्य कला मंच व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.