Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पारशिवनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पारशिवनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, डिसेंबर ०९, २०१७

पेंचच्या पाण्यावर पहिला हक्क फक्त शेतक-याचा

पेंचच्या पाण्यावर पहिला हक्क फक्त शेतक-याचा

बच्चू कडू ; निमखेडा येथे प्रहार संघटनेचे हंटरमार शेतकरी आक्रोश सभेचे आयोजन

पारशिवणी/ तालुका प्रतिनिधी ::
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम शाषणा द्वारे करण्यात येत आहे.शेतकर्यांपासून तर सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या भुलथापा देऊन हे सरकार सत्तेवर आलं शेतकऱ्यांचं शेतमाला वर आस्मानी व सुल्तानी संकट कोसळले असतांना पेंच प्रकल्पातील पाणी देखील शेतकऱ्यांना पुरविण्यात आले नाही शाषणाने पेंच धरणाचे पाणी फक्त शेतकर्यांचा शेतीच्या सिंचनासाठीच आरक्षित ठेवावे कारण धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकर्यांचाच अशे वक्तव्य प्रहार संघटनेचे संस्थापक,आमदार बच्चू कडू यांनी
तालुक्यातील निमखेडा (गो.पा.) येथे आयोजित प्रहार संघटनेच्या क्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग युवक,बेरोजगारांच्या प्रश्नांवर शिवसेना-भाजप युती सरकारच्या अन्यायकारी धोरणाचा निषेधार्त प्रहार हंटरमार शेतकरी आक्रोश सभेचे आयोजना दरम्यान केले.

कार्यक्रमाल प्रहार संस्थापक बच्चु कडु,प्रहार रामटेक विधानसभा क्षेत्र संयोजक रमेश कारामोरे,प्रहार शेतकरी संघटना रामटेक क्षेत्र प्रमुख महेंद्र भुरे,किशोर बेलसरे, गज्जु घरडे,संगिता वांढरे,बाल्या रामेलवार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आलेली होती.प्रमुख मान्यवरांनी रामटेक,पारशिवणी,मौदा तालुक्यातील शेतकरी शाषणाच्या उदासीन धोरणांमुळे हतबल झालेले असताना प्रहारच्या नेतृत्वात क्षेत्रातील शेतकरी वर्गाला शाषणा विरोधात एल्गार फुंकण्यासाठी गावपातळी पासून तर तालुकास्तरापर्यंत प्रहार स्टाइलची आंदोलने पुकारण्या साठी शेतकरी वर्गाला एकत्रित आणण्याचे कार्य सध्या प्रहार करत असल्याची माहिती महेंद्र भुरे यांनी स्पष्ट केली.

सरकारचा भोंगळ कारभारचा फटका शेतकऱ्यांना पड़त असून शाषणाच्या बिनतारेच्या धोरणा मुळे लाखो एकर शेती चा सिंचनाचा होत आहे.नागपुर महानगर पालिकेने आपली पिण्याच्या पाण्या चा सोईसाठी इतर किंवा वेगळे धरण बांधुन पेंच धरणाचे पानी शेतकर्यांसाठी देण्यास आरक्षण वाड़विणे गरजेचे आहे मात्र युती तिल सत्ता नेते याकडे दुर्लक्ष करुण शेतकऱ्यांचा जीवाशि खेळत असल्याचा आरोप रमेश कारेमोरे यांनी करत स्थानिक भूमिपुत्राणा साथ दया ऐसे आव्हान व्यास पीठावरून केले.

संचालन प्रशांत चौहान,प्रास्ताविक देविदास तडस,आभार पुरण तांडेकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमरदिप मथुरे, बैशाखु जनबंधु, प्रफुल चौहान, राहुल ईंगडे, गणेश सरोदे,श्रीकांत बावणकुडे,आकाश दिवटे,रामलाल पट्टा,भरत गोखे,उमेश माहाजन,गज्जु सावरकर,लक्षमण खंडार,लक्षमण ठाकरे,शंकर पोटभरे देविदास तडल,प्रशांत चौहान,पुरण तांडेकर,नरेश हिंगे,शुभम घावडे,दिगांबर हिंगनकर,प्रविण सेल्लारे,किशोर नांदुरकर,अतुल कडु, विनु घावडे,संदिप हिंगे,सोपान चौहान,आकाश हिंगे, सुभाष डोकरिमारे,गुणवान आंबागडे,किशोर नांदुरकर, मनोज चोपकर,गजानन चांदेकर,हेमराज तडस,नितेश लक्षने,रुपेश मदनकर,राहुल हिंगे,स्वपनिल वाडिभस्मे, राजकुमार चांदेकर,राजु वैरागडे,कल्पेश वैद्य,श्याम चांदेकर,सुनिल गजभिए,शिशपाल वाहने,हितेश आजरे, अशोक भलावी, यांनी प्रयत्न केले.

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

 रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह

रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह

पारशिवणी ::
 पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्ज अँड ह्यूमन रिसोर्सेस नागपूर व दणका युवा संघटन,कांद्री,कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या रोग निदान शिबिराचे पदार्पण तेराव्या आठवड्यात पोचले आहे.या शिबिराने तालुक्यासह कन्हान उपशहरा लगत असलेल्या साटक जिल्हा परिषद व टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा लगत तालुक्या बाहेर सुद्धा ग्रामीण व शहरी भागात गर्जुना मोफत रोग निदान तपासनी,मोफत चष्मे वितरण शिबिराच्या या आयोजना ला सातत्याने जोपासण्याची धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती.आणी यशस्वी रित्या या रोग निदान शिबिराचा लाभ ग्रामस्थांन पर्यंत पोचत असल्याने क्षेत्रात दणका युवा संघटनेच्या शिरावर यशाचा तुरा क्षेत्रातील लोकांनी रोवून दिलेला आहे.

          याच उपक्रमात मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी निशुल्क रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह शिव नगर कान्द्री- कन्हान येथे आयोजित करण्यात आलेला होता.या शिबिरात विविध प्रकार च्या रोगांची तपासणी करण्यात आली ज्यात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र रोग, मोतीया बिंद अश्या इतरत्र रोगांच्या निदानाचा लाभ कांद्री वासीयांनी घेतला,नेत्र रोग्यांना   मोफत चष्मे वितरित करण्यात आले.प्रसंगी शिबिराचे मुख्य आयोजक दणका युवा संघटन,युवा चेतना मंच कान्द्री आणि नेहरू युवा केंद्र पारशिवणी,माजी.जील्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे,दिनेश नानवटकर, रिंकेश चवरे, सुरेश तिवाडे, शैलेश शेळके, विनोद कोहळे, गौरव माहोर, राहुल चामट, सौरभ पोटभरे, यांची उपस्थित होती तर मंगळवार ५ डिसेंम्बर रोजी सालवा येथे चौदाव्या शिबिराचे लाभ घेण्या करिता जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आयोजकांकडून करण्यात आले.

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

राष्ट्रवादीकाँग्रेसला सोडचिठ्ठी; तालुकाध्यक्षांचा शिवसेनेत गृहप्रवेश

राष्ट्रवादीकाँग्रेसला सोडचिठ्ठी; तालुकाध्यक्षांचा शिवसेनेत गृहप्रवेश

पारशिवनी,  : तालुक्यातिल चांपा (बोर्डा) गावातिल शेतकऱ्यांन तर्फे माजी आमदार आशिष जैस्वाल यांचा रब्बी पिकांना पेंच प्रकल्पातून पाणी सोडन्या साठी शाशन व प्रशाषणा सोबत कायद्याने लढा देत शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्या बाबद सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे,उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलाश खंडार यांच्या कडून आयोजित कार्यक्रमात खंडार यांच्या सह शेकडो कार्यकर्ता व पदाधिकार्यांनि शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

शक्यतो फरवरी मार्च मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे तालुक्यात वाहायला सुरवात झाली असून पक्षांच्या पुढाऱ्यांचे मतभेदांमुळे पक्षीय नेत्यांची पक्षांतर करण्याला सुरवात झाली असल्याचे चित्र २४ नोव्हेंबर ला चांपा येथे माजी आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाले.खंडार हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद साटक-गोंडेगाव साठी जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले होते.परंतु पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व खंडार यांच्यात आगामी जिल्हा परिषद उमेदवारी वरून दोघात अंतर्गत कलह उफाडुन आल्याची चर्चा तहसील तसेच राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत सुद्धा सुरू होती.अशातच खंडार यांनी पक्षीय कलह कायमस्वरूपी संपविन्यासाठी रब्बी पिकाला पाणी मिडवून देण्याच्या विषयाला धरून माजी आमदार आशिष जैस्वाल यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करीत त्याच कार्यक्रमात खंडार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान शहर अध्यक्ष नेवालाल सहारे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विघे,युवक तालुका अध्यक्ष नरेश भोंदे,किंग कोब्रा युथ फोर्स चे तालुका संपर्क प्रमुख अनिल गजभिये,केरडी सरपंच प्रकाश पडोळे, उपसरपंच लक्ष्मण खंडाळ, बनपुरी उपसरपंच राकेश उपासे, सदस्य मारोती वानखेडे, धनराज खंडाळ ,प्रकाश काठोके, गजानन हिवसे, सह शेकडो कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेष घेतला.

ज्यामुळे गोंडेगाव जिल्हा परिषद अंतर्गत शिवसेनेची ताकत वाढली परंतु शिवसेनेतून आगामी निवडणुकीत आपली दावेदार ठेवणार्या शिवसेनेतील पक्षनिष्ठ कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या इच्छा आकांक्षांची हिरमोळ होण्याची शक्यता खंडार यांच्या शेकडो कार्यकर्त्यां सह शिवसेनेत आगमनाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार कृपाल तुमाने हे होते. सत्कारमूर्ति माजी आमदार आशीष जैसवाल,जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर,उप जिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे,पंचायत समिती उपसभापति जिवलंग पाटील,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नरेश राऊत,तालुका अध्यक्ष राजू भोस्कर यांची उपस्थिती होती.

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

जुनी कामठीवर भाजपची एकहाती सत्ता

जुनी कामठीवर भाजपची एकहाती सत्ता

पारशिवणी - तालुक्यातील ग्राम पंचायत जुनी कामठी-गाडेघाट येथे ९ सदस्यीय व १ सरपंच अश्या १० सदस्यांन साठी निवडणूक घेण्यात आली होती.यात भाजप च्या सरपंचासह ६ सदस्य भाजपने जिंकून आणून आपला कमळ फुलविलेला होता.उपसरपंच पदाचे निवडणूक दि.२३ नोव्हे ला ग्राम पंचायत कार्यालय जुनीकामठी येथे संपन्न झाली ज्यात जुनीकामठी ग्राम पंचायत वर भाजप पक्षाचे भूषण वामन इंगोले यांनी स्वतःच्या मता सह ६ मते घेऊन एकतरफा विजय मिळविला. सरपंच व उपसरपंच निवडी मुळे भाजप पक्षाच्या हातात बहुमताने जुनीकामठी ग्राम पंचायत ची सत्ता आली.जुनीकामठी ग्राम पंचायत मध्ये भाजप कडून भूषण इंगोले आणि काँग्रेस मधून अनिल वयले यांनी उपसरपंच पदा करिता आपले नामांकने निवडणूक अध्यासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच मोहन खंडारे आणि ग्रा.प. सचिव आतिष देशभ्रतार यांच्या सुपूर्द करण्यात आलेली होती. ज्या नंतर लगेच ९ सदस्यांन कडून उपसरपंच पदाच्या उमेदवारी साठी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली.भाजपच्या भूषण इंगोले यांच्या समक्ष कुठल्याही प्रकारचे मोठे आव्हान काँग्रेस च्या प्रतिद्वंदी उमेदवार अनिल वयले यांच्या कडून नव्हते कारण भाजप पक्षाकडून सरपंच पदा सह ६ सदस्य जिंकून आणत पक्षाने आधीच आपल्या उपसरपंच पदाची वाट मोकळी केलेली होती.मतमोजणी ला सुरवात होताच अनिल वयले यांना काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची ३ मते तर भूषण इंगोले यांना भाजपची स्वतःच्या मता सह ६ मते गेलीत ज्यामुळे एकतर्फी विजय जुनीकामठी ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदावर इंगोले यांनी मिळवीला.भाजप पक्षा कडून अभिर गुलाल उडवत समर्थकांची तोंड गोड करून आनंदाचा उत्सव भाजप पक्षा कडून साजरा करण्यात आला.मतदान प्रक्रियेत मध्ये सुषमा खंते,राहुल ढोके, माया मडावी,विद्या बावणे, सुजाता कावळे,भूषण इंगोले,निलेश वयले, विनायक खंडाते,सोनटक्के या नवनिर्वाचित सदस्यांनी सहभाग घेतला.

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

गोंडेगावात अपक्षाचे वर्चस्व

गोंडेगावात अपक्षाचे वर्चस्व

उपसरपंच पदावर विनोद सोमकुंव, तर सरपंचपदावर नितेश राऊत

पारशिवनी - तालुक्यातील साटक जिल्हा परिषद अंतर्गत सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या गोंडेगाव येथील ग्राम पंचायतीवर सरपंच उपसरपंच पदावर अपक्ष उमेदवारांनि आपल्या कुशल नेतृत्वाचा झेंडा रोवल्याने क्षेत्रातील राजकीय पुढाऱ्यांच्या तोंड चे पाणी उडाल्याचे चित्र दिसून पडत आहे.
११ सदस्यीय असलेल्या ग्राम पंचायत गोंडेगाव मध्ये सरपंच जनतेतून झाल्याने ग्राम पंचायत गोंडेगाव मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीत बर्याच उमेदवारांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आपल्या कामांचा दाखला देत गोंडेगाव सरपंच पदावर आपल्या आपल्या नावांची वर्णी लावलेली होती.जिथे कुठल्याही प्रकारची राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या २४ वर्षीय युवा उमेदवार नितेश सीताराम राऊत याला ग्रामस्थानी बहुमताने आपल्या गावाचे नेतृत्व सांभाडण्याची जबाबदारी देण्याचे ठरवत राजकीय पक्षांना देखील इथे ग्रामस्थांनि शिथिल करून सोडत सरपंचपदाचा एकतर्फी बहुमान राऊत वर्णी लाग्ली
गोंडेगाव ग्राम पंचायत येथील उपसरपंच पदाचे निवडणूक दि.२२ नोव्हे ला गोंडेगाव ग्राम पंचायत कार्यालय येथे झाली ज्यात अपक्ष उमेदवार विनोद सोमकुंवर यांनी तर आशिमा वासनिक यांनी उपसरपंच पदासाठी आपली नामांकने पीठासीन निवडणूक अधिकारी नवनिर्वाचित सरपंच नितेश राऊत व ग्राम विकास अधिकारी रत्नाकर पालांदुरकर यांच्या सुपूर्द केले.जिंकून आलेल्या उमेदवारांपैकी कुणाचीही राजकीय वरचढ नसल्याने पक्षीय झेंडा व पक्षाचा अजेंडा गोंडेगाव येथे पाहायला मिळाला नाही त्यामुळे उपसरपंच पदासाठी चुरशीच्या लढाई चे चित्र सोमकुंवर या उमेदवाराने रंगवून आणले ११ सदस्यांन पैकी ५ उमेदवारांना सोमकुंवर यांनी राजकीय बेरीज वजाबाकीचे गणित करत आपल्या बाजूने करून घेतले ज्यामुळे दुपारी २ वाजता सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत ११ सदस्यांनी आपली मते गुप्त पद्धतीने उपसरपंच पदाच्या उमेदवारांना दिले.ज्यात मत मोजणी मध्ये आशिमा वासनिक यांना ५ मते तर सोमकुंवर यांना स्वतःच्या मता सह ६ मते मिडाल्याने उपसरपंच पदाची माळ विनोद सोमकुंवर यांच्या गळ्यात पडली व गोंडेगाव ग्राम पंचायतीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न फडकता स्वतंत्र युवा नेतृत्वाच्या माध्यमाने विकासाचा झेंडा लागल्याचे चित्र दिसून पडले.विनोद सोमकुंवर,मोरेश्वर शिंगणे,पूजा रासेगावकर,रेखा काळे,शेंद्रे,सुनील धुरिया,सुभाष डोकरीमारे,असीमाँ वासनिक,ललिता पहाडे,निर्मला सरवारे,आकाश कोडवते या नवनियुक्त सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.