Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

न्यायालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
न्यायालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

 हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग भागात स्कॉर्पिओ वारंवार अंगावर घालून तिघांचे खून केल्याचा आरोप असलेल्या सात आरोपींची मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या अभावी संशयाचा लाभ देत निर्दोष सुटका केली.
जगदीश विठ्ठल कोसूरकर, दिलीप विठ्ठल कोसूरकर दोन्ही रा. छापरूनगर, रॉबीन राहुल बोरकर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे, दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले, रवी सदानंद खोब्रागडे आणि तुषार ऊर्फ दद्दू छोटुजी लोणारे, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृताची नावे होती.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, हिवरीनगर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल चेपट्या हा २० जून २०१४ रोजी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे कुख्यात गज्जू वंजारी याच्या लग्न संमारंभात गेला होता. या ठिकाणी चेपट्यासोबत जगदीश कोसूरकर आणि त्याच्या साथीदारांनी भांडण केले होते. आरोपींनी चपट्यावर तलवार, चाकू आणि सुरी उगारून दगडफेक केली होती. चेपट्यासोबत असलेले जुना बगडगंज भागातील प्रदीप भारत घोडे, रशीदखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, असे चौघे जण फ्रिडम मोटरसायकलने पळून जात असता आरोपींनी त्यांचा स्कॉर्पिओने पाठलाग सुरू केला होता. हसनबाग भागात आरोपींनी स्कॉर्पिओ राँगसाईड घेत मोटरसायकलवर धडकवली होती. मोटरसायकल चालवीत असलेला प्रदीप घोडे हा पळून गेला होता. तर उर्वरित तिघे स्कॉर्पिओच्या धडकेने ठार झाले होते.
प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रारंभी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), २०१, १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६(ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढे या आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली होती. केवळ सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. उर्वरित अखेरपर्यंत फरार राहिले. सहाय्यक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात साक्षीपुराव्यादरम्यान महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

पुढील तारखेला आणा जामीनदार

पुढील तारखेला आणा जामीनदार

तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावीसह अशोक माडावारला न्यायालयाची सूचना

गडचिरोली -
देसाईगंज येथील पत्रकार डा विष्णु वैरागडे यांना बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन मारहाण, शिवीगाळ तसेच जबरी मौल्यवान वस्तु पळवून नेल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी मामला क्रमांक ३५/२०१७ व ३६/२०१७ मध्ये  ता. २८ ला विष्णु वैरागडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन विरुद्ध माधुरी मडावी या दोन प्रकणात जामिनावर सूटका करून घेण्यासाठी पुढील तारिख १६ डिसेंबर न्यायालयाने  दिली आहे.

देसाईगंज येथील नगर परिषदेच्या तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या विरूद्ध नगरसेवक, पदाधिकारी तसेच पालिका कर्मचारी यांच्याशी हूकूमशाहीने व मनमानी वृत्तीने वागत वारंवार अट्रासिटीची धमकी देतात. नियमबाहय, आकसापोटी कारवाई करित असल्याने त्यांच्या कामकाजावर विश्वासच न राहिल्याने देसाईगंज नगर परिषदेच्या विशेष सभेत प्रस्ताव क्रमांक ५७१ व ५७२ अन्वये ८ जून २०१० एकमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आले होते. याबाबत पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या अविश्वास प्रस्तावाला केराची टोपली दाखविले होते. अखेर अविश्वास ठराव घेणाय्रा नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावून रिठ याचिका क्रमांक २९७२ /२०१० अन्वये दाखल केली होती . यावर  उच्च न्यायालयाने २७ जूलै २०१० ला ८ आठवड्याच्या आत बदली संदर्भात निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला निर्देश देऊन प्रकरण निकाली काढले होते. या आठ आठवड्यात नगरविकास विभागाने तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी हीची शासन आदेश क्रमांक एम सी ओ १२१०/प्र. क्र. १२६ /नवि १४ नुसार दि. २७ सप्टेंबर २०१० ला रामटेक येथील नगरपारिषदेत उचलबांगडी केली होती. या दरम्यान मूख्याधिकारी मडावी या वैद्यकीय रजेवर जाऊन या बदली आदेशाला मॅट मध्ये ३० सप्टेंबर २०१० ला आव्हान दिले होते, त्यात सदर याचिका मॅटने फेटाळून लावली होती . त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन न करता आपल्याच बदलीआदेशाला स्थगीती दिली होती. त्यानंतर ती परत देसाईगंज नगर परिषदेत रूजू झाल्यावर नगर परिषद नगरसेवक व पदाधिकारी तसेच वास्तविक बातम्या प्रकाशित करणाय्रा पत्रकारांवर सूड भावनेतून आपल्या पदाचा गैरवापर करून बदला घेणे सूरू केले होते. दरम्यान अविश्वास ठरावासंदर्भात उच्च न्यायालय निर्णयाचे पालन न केल्याने अवमानना याचिका दाखल करून नगरविकास विभागाला नोटीस बजावण्यात आली. त्या नंतर तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांची पुन्हा रामटेकलाच नगरपारिषदेत स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र बदलीवर रामटेक ला जाण्यापूर्वि वादग्रस्त कार्यकाळ व बदली संदर्भात संपूर्ण प्रकरणाची सखोल बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून आपल्या पदाचा गैरवापर करून हेतूपूरस्पर कधी नगर परिषद गाळ्याचा विषय घेऊन, तर कधी पॅथालाजी संदर्भात देसाईगंज पोलीस स्टेशनने ५ सप्टेंबर १९९१च्या शासन परिपत्रकानूसार बोगस पॅथालाजी

धारकांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या पत्र क्रमांक २०७ /१० तसेच १३१५ /१० मध्ये दिलेल्या संपूर्ण संदर्भिय पत्रात डॉ विष्णु वैरागडे यांच्या पॅथालाजीचा नावच नसतांना एनकेन प्रकारे त्रास देणे सूरू केले होते.मात्र नगरविकास विभागाने उच्च न्यायालय नागपुर येथिल निर्णयाचा संदर्भ देऊन केलेल्या बदली संदर्भात पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी बातमी प्रकाशित केल्याने अक्षरशः चिडून जाऊन रामटेक ला रूजू होण्यापूर्वी कसली ही पूर्व सूचना न देता आरोपी माधुरी मडावी व अशोक माडावार हे दोघेही डॉ विष्णु वैरागडे यांच्या कार्यालयात बेकायदेशीर व नियमबाहय घूसून तू माझ्या विरूद्ध बातम्या प्रकाशित करतोस, माझी बदली करतोस काय असे संबोधून, अश्लील शिवीगाळ, मारहाण करून कार्यालयातील मौल्यवान वस्तु जबरीने पळवून नेल्याप्रकरणी देसाईगंज येथील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ००६७ /१० अंतर्गत २१ आक्टोंबर २०१० ला भारतीय दंड विधान २९४, ३९२, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. 

           गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशनने आरोपी तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी व आरोपी अशोक माडावार यांना अटक केली नव्हती. त्यानंतर डॉ विष्णु वैरागडे यांनी देसाईगंज येथील न्यायालयात  कलम १५६ (३) यासह कलम १९० क्रिमिनल प्रोसेक्यूशन कोड अंतर्गत फौजदारी मामला क्रमांक ९८९ /२०११ अन्वये देसाईगंज न्यायालयात दाखल केली होती. ही याचिकेवर मागील सहा वर्ष १० महिन्यांपासून सूनावणी सूरू आहे. सदर याचिका गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पाठविण््यात आले.यात आता पर्यंंत याचिकाकर्ताकडून ४ तर बचाव पक्षाकडून पाच साक्षदारांनी साक्ष नोंदविले आहेत.याचिकाकर्त्याच्या वतीने अड संजय गुरू व मृनाल मेेेेञाम बघत आहेत.

माधुरी मडावी ह्या अद्याप ११.११.२००८ पासून परिविक्षाधीन कालावधी संपूष्ठात आलेला नसून रामटेक येथे कार्यरत असतांना त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम १९७९ नियम ८ खाली प्रस्तावित केली असून सदर शिस्तभंग विषय कारवाई परिविक्षाधीन कालावधी दरम्यान असल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्यास विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत परिविक्षाधीन कालावधी वाढविण्यासाठी नगर विकास विभागाने राज्यपाल च्या आदेशानुसार ६ सप्टेंबर २०१६ ला काढलेला होता. ज्या ठिकाणी कार्यरत होत्या त्या ठिकाणी नेहमीच वादग्रस्त ठरल्या अाहेत.

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा


अहमदनगर - लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केले यांनी आज आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तीनही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय सामूहिक बलात्कार, कट करण्यासह अन्य एका गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील मंदिर मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. पीडित मुलीच्या आई-वडिलांसह गावकरी तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.


लोणीमावळा तालूका पारनेर येथे 22 आॅगस्ट 2014 रोजी शाळकरी मुलीचा तिघांनी बलात्कार करून खून केला होता. निघृण पद्धतीने शाळकरी मुलीचा खून झालेला असतानाही हा खटला सुरुवातीच्या काळात आरसा गाजला नाही. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर  2014 रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले तर 1 जुलै 2015 पासून सुनावणी सुरू झाली. 7 जुलै 2017 रोजी सुनावणी संपली. 

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी जे कही साक्षीदार नव्हता मात्र निकम यांनी 24 परिस्थितीजन्य, पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर,  मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवले. दोन दिवसांपूर्वी आरोपी व सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद झाल्यानंतर आज निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. आज सकाळी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा पत्राचे वाचन करण्यात आले. हत्येचा कट करणे,  सामूहिक बलात्कार या प्रकारामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच खून आणि अत्याचार या प्रकरणांमध्ये तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी करून वसूल करण्यात येणाऱ्या दंडा पैकी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाला दिली जाणार असून पन्नास हजार रुपये सरकारी जमा होणार आहे याशिवाय माध्यमातून होणारी रक्कम ही सरकारी जमा होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह आरोपीचे वकील अॅड. राहुल देशमुख, अॅड. अनिल आरोटे, आणि अॅड. परिमल फळे, यावेळी उपस्थित होते.