Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चिमुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिमुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल ०१, २०१८

महाबली पंचमूखी हनुमानजीच्या नावाने गुंजली चिमुरनगरी

महाबली पंचमूखी हनुमानजीच्या नावाने गुंजली चिमुरनगरी

चिमुर तालुका प्रतिनिधी:
        संकटमोचक रुद्रावतार महाबली जयंती निमीत्य चैत्र पोर्णीमाला पंचमूखी हनुमानजीची भव्य मिरवणुक चिमूर शहरातुन काढन्यात आली. यावेळी महाबली हनुमान पंचमुखीच्या नावाने चिमुर नगरी गुंजली.
         शहरातील अनेक हनुमान मंदीरात सकाळ पासुनच चैत्र पोर्णिमाला भावीक भक्तानी पुजा अर्चना केली. इंदीरा नगर येथील जय बजरंग देवस्थानक कमेटी, महाबली हनुमान मंडळ वडाळा (पैकु),मानीक नगर हनुमान मंडळ, पंचायत समीती जवळील हनुमान देवस्थान कमेटी, हजारे मोहल्ला बजरंग कमेटी, आदी मंदीरात भक्तीभावाने भावीकांनी महाबली हनुमानजीच्या मुर्तीला माथा टेकला व हनुमान चालीसाचे पाठ करन्यात आले.
          पंचमुखी हनुमान कमेटीचे विनोद शर्मा यांच्यावतीने चिमुर शहरात भगव्या झेडया व पताका लावुन चिमुर भगवामय करन्यात आला. चैत्र पोर्णीमाच्या सायंकाळी आखाडा,. हनुमानजीची प्रतीकृती, विवीध झाकीसह धुमाल पार्टीच्या तालावर महाबली पंचमुखी हनुमानजी मिरवणुक पंचायत समितीच्या जागृत हनुमान मंदीरातुन बालाजी मंदीर, नेहरू चौक, बसस्थानक परिसर , मासळ रोड, चावडी मोहल्ला, मार्केटलाईन , शिवाजी चौक, गोडं मोहल्ला मार्ग भव्य मिरवणुक काढन्यात आली. यावेळी अनेक हनुमान भक्त धमाल पार्टीच्या तालावर थिरकले या रॅलीत हजारो भावीकांची उपस्थीती होती.नंतर मिरवणुकीची नेहरू विद्यालय जवळ सांगता करन्यात आली.
           महाबली हनुमान जयंतीनिमीत्य शिव साम्राज्य प्रतीष्ठानतर्फे नेहरू चौक येथे सरबतचे वितरन व चिमूर एसटी आगार कर्मचारी युनियन व्दारे महाप्रसादाचे वितरण करन्यात आले. शहरातील विविध प्रभागातील हनुमान मंदीरात हनुमान भक्तासाठी जेवणाची व्यवस्था करन्यात आली होती.
हनुमान जयंती यशस्वी करण्यासाठी विनोद शर्मा ,राकेश  नदुरकर, प्रवीण कावरे,श्रीनिवास निवटे प्रकाश असावा सुधाकर पचारे, प्रफुल कावरे, बंटी वनकर,  विशाल शिवरकर, अभिलाष खारकर सोहेल चन्ने, उमेश सोनवणे ,संदीप घोडमारे,निलेश गिरी, अजय माहुरकर राजू गजभे,छगन दिघोरे,  अफसर शेख  आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

बुधवार, फेब्रुवारी १४, २०१८

 पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

चिमुर/प्रतिनिधी:
 कोणत्याही सामाजिक ऊपक्रमाची सुरुवात स्वत: पासुन करायची या भावनेने प्रेरित होउन पर्यावरण संवर्धन समीती भिसी तर्फे भिसी प्लास्टिक मुक्तीची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी पासुन करण्यातआली. 
                      प्लास्टिक हा पर्यावरणाला धोका पोहचविणारा घटक आहे . प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषण  दिवसेदीवस वाढत आहे .त्यातच भीसी येथील प्राथमीक आरोग्य केंद्र प्लास्टिकच्या साम्राज्यात फसले होते. प्लास्टिक कूजत नसल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. भीसी येथिल आरोग्य केंद्रामध्ये सलाईन, ईन्जेक्शन , विघटन न होणारे पदार्थ  असल्यामुळे  सर्व परिसर प्लास्टिकमय झाला होता.
 पर्यावरण संवर्धन समीती भीसी कडुन प्राथमीक आरोग्य केद्र प्लास्टिक मुक्त करण्यात आले  यावेळी  पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे,  प्रा. गजानन माडवे ,पंकज वर्मा, सुरेशजी बैनलवार, श्रीकांत ठोबरे ऊमाकांत कामडी,  कुणाल खवसे, कैलास रामटेके , सचीन खडके ,प्रविन लोहकरे , मोहन केडझरकर, आशिष पडोडे , अक्षय खवसे, रमेश हीवरे , आबीद शेख, चंद्रशेखर रेवतकर, आदि सदस्य उपस्थित होते . तथा आरोग्य केद्रा तील कर्मचारी वृंद उपस्थित  राहून प्लास्टिक मुक्तीसाठी सहकार्य केले . पर्यावरण समीतीच्या सामाजिक उपक्रमाचे जीकडे - तीकडे कौतुक होत आहे. 

शुक्रवार, फेब्रुवारी ०२, २०१८

बालाजी भक्तांनी फुलली क्रांती नगरी

बालाजी भक्तांनी फुलली क्रांती नगरी

गोवीदां गोवींदाच्या गजरात चिमुर नगरी मंत्रमुग्ध  

चिमुर/(विनोद शर्मा)
                 तिनशे नव्वद वर्षाची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला २२ जानेवारी पासुन सुरुवात झाली . माञ प्रत्यक्षात सोमवारला रातघोड्या पासुन घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला .गुरुवारला दुपारी बारा ते तिन वाजता घोडा रथ यात्रेचा गोपाल काला हजारो अबाल वृद्ध  युवा बालाजी भक्ताच्या उपस्थितीत गोविंदा गोवीदा च्या गजरात " श्री चा गोपाल काला संपन्न झाला. या कारीता पंचक्रोषीतील हजारो  बालाजी भक्ताच्या उपस्थितीने क्रांती नगरी बालाजी भक्तांनी  फुलली होती.
                  पेशवाईच्या काळात जिर्णाद्वार झालेल्या या बालाजी मंदीराला ३९१ वर्षाचा ईतीहास आहे . मंदीराची वास्तू भोसले कालीन आहे चिमुर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली . आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संoयेने गर्दी करतात .
सोमवारला रात घोडयाच्या मिरवनुकीत हजारो भक्त रात्री एक वाजता   मोठया उसाहात सामील झाले होते. भक्ती सगींताच्या तालावर व आतीष बाजीने बालाजी भक्ताचे डोळ्याचे पारने फिटले तर गोविंदा - गोविदा च्या गजराने क्रांती नगरी दुमदुमुन गेली होती.

                         गुरूवारला बालाजी महाराजाच्या घोडा रथ यात्रेच्या नवरात्र समाप्ती ला गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते त्याकरिता आज सकाळ पासुनच बालाजी भक्तांच आगमन बालाजी मंदीर परिसरात होण्यास सुरूवात झाली . दुपारी दोन वाजता पर्यत पुर्ण परिसर बालाजी भक्तांनी हजारोच्या संर०येत गर्दी केली होती. दुपारला हभप खोडं महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर गोपाल काला करण्यात आला. याकरीता मदीराचे अध्यक्ष निलम राचलवार, अॅड ' चंद्रकांत भोपे,डाहुले, भलमे, डॉ दिपक यावले आदी उपस्थित होते.
                 महाशिवरात्री पर्यंत चाल णाऱ्या घोडा रथ यात्रेमध्ये बालाजी मंदीराच्या आवारात आमदार मितेष भांगडीया . आमदार कीर्तीकुमार भागांडीया . यांच्या वतिने कलकत्ता येथीत मॉं काली मंदीराची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधुन घेत आहे. यात्रे दरम्यान चिमुर नगरीत मनोरजंनाच्या साधना सह, मौत का कुआ, आकाश पाळने, असे अनेक प्रकारच्या दुकानासह , मिनि सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.
               स्थानीक नगर परिषद प्रशासनाने बालाजी भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. तर पोलीस प्रशासणाकडुन शा तंता वॅ सुव्यवस्था राखण्याकरीता १२५ कर्मचारी १o अधिकाऱ्याची नियुबनी केली आहे. त्यामध्ये दोन ठिकानी मदत केंद्र तयार केले आहे . तर मंदीर परिसरातुन जाणारी वाहतुक बंद करण्यात आली असून . ति वाहतुक मोठ्या मजीद पासुन कार्ट परिसरातुन वळवन्यात आली आहे.
अन् त्यांनी भरविला मायेचा घास
अवघ्या विदर्भात प्रसिद्ध असलेल्या क्रांती नगरीतील श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रेसाठी हजारोच्या संख्येत भाविक हजेरी लावून बालाजीला नतमस्तक होतात. यामध्ये अबाल वृद्ध महिला, युवक यांचा मोठा भरणा असतो. बाहेर गावातुन येणाऱ्या या बालाजी भक्तानी क्रांती नगरीतीन उपाशी जावू नये यासाठी क्रांती नगरीतील भाजपा, कॉग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी कॉग्रेससह स्थानिक स्वराज्य सस्था , स्वयंमसेवी संस्थेकडुन मसाला भाताच्या वितरणाचे स्टॉल लावून बाहेर गावातुन आलेल्या बालाजी भक्ताना मायेचा घास भरविला जातो.