Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०८, २०१८

एकदाचे वीज निर्मिती प्रकल्प बंद करा मात्र चंद्रपूरकरांच्या पिण्याच्या पाण्यात कपात करू नका:किशोर जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:              
                उन्हाळा सुरू होण्या आधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पाहिले दररोज शासकीय नळ येत होते पण आता दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने नळ येत आहेत . त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वन-वन भटकावे लागत आहे. आधीच शहरात 30% जनतेस शासकीय  नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा होते ते सुद्धा नागरिकांना योग्य रित्या पिण्यासाठी पाणी मिळत नाही. वीज निर्मिती प्रकल्पाला शासनाकडून होत असलेला पाणी पुरवठा कमी करून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच आवश्यक पडल्यास शासनाने वीज निर्मिती प्रकल्प बंद करावे असा प्रश्न उपस्तिथ करत शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले याप्रसंगी नगरसेवक विशाल निंबाळकर, इरफान शेख, विनोद अनंतवार, अशोक खडके, लोकेश कोटरंगे यांची उपस्तिथी होती...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.