Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कोल्हापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोल्हापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले; एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले; एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन



एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दगावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव अनिल मारुती कांबळे, वय ३८ आहे. #ST #Employee #Death |  #STStrike

कोल्हापुरातील एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले होते. सावंतवाडी आगारात अनिल चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एसटी महामंडळाच शासनात विलिनीकरण करण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात येत आहे. याच तणावामुळे एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला आहे. अनिल मारुती कांबळे (वय-38) अस मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मडीलगे खुर्द गावात त्यांचे निधन झाले.

एसटी संपाचा तिढा सरकार सोडवत नसल्याने कांबळे यांना ताण आला होता. तसेच शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान कांबळे हे 2015 साली एसटी सेवेत सावंतवाडी आगारात भरती झाले होते.

सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१

 माहीती अधिकार,पोलीस मित्र  व पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड

माहीती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड

पेठ वडगांव : येथील मोहन शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन.न्युज 24 सलग्न माहीती अधिकार, पोलीस मित्र  व पत्रकार संरक्षण सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी  निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तुळशीराम जांभूळकर यांनी दिले.

या निवडीसाठी संघटनेच्या  महाराष्ट्र खानदेश विभागीय अध्यक्ष श्री.जयवंत धांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना

कोल्हापूर- एका वृद्ध महिलेनं राहत्या घरात  स्वत:ची चिता रचून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडलीये.कलव्वा कांबळे असं मृत महिलेचं आहे.

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना घडलीये. कलव्वा कांबळे ह्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. आपले काम आपणच करून स्वतःला लागेल तेवढे अन्न तयार करून खात होत्या. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी स्वतः चिता रचली आणि अंगाभोवती साड्या गुंडाळून पेटवून घेतले. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. वृद्ध महिला नेहमीप्रमाणे घराबाहेर आली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव

विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव

कोल्हापूर/सांगली :
 सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृतदेह पोलिसांकडूनच आंबोलीत जाळण्याच्या घटनेने गृहविभाग अडचणीत आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीसाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व अनिकेतच्या नातेवाईकांकडून आता दबाव वाढत आहे.
या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात दिली.  केसरकर यांनी सांगलीत जाऊन अनिकेतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोठा- छोटा अधिकारी न पाहता दोषींवर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
प्रत्यक्षदश्री अमोल भंडारेलाही मारण्याचा कट
अनिकेतच्या मृत्यूचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार अमोल भंडारे यालाही मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून बाहेर आली आहे.
आत्मदहनाचा इशारा
आमच्या मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने केसरकर यांना दिला. 
आज सर्वपक्षीय बंद
अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी सांगलीत सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कृती समितीतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल.

सोमवार, नोव्हेंबर ०६, २०१७

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका


कोल्हापूर / प्रतिनिधी : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.* ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.