Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले; एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन



एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दगावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव अनिल मारुती कांबळे, वय ३८ आहे. #ST #Employee #Death |  #STStrike

कोल्हापुरातील एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले होते. सावंतवाडी आगारात अनिल चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एसटी महामंडळाच शासनात विलिनीकरण करण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात येत आहे. याच तणावामुळे एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला आहे. अनिल मारुती कांबळे (वय-38) अस मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मडीलगे खुर्द गावात त्यांचे निधन झाले.

एसटी संपाचा तिढा सरकार सोडवत नसल्याने कांबळे यांना ताण आला होता. तसेच शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान कांबळे हे 2015 साली एसटी सेवेत सावंतवाडी आगारात भरती झाले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.