Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

औरंगाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
औरंगाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै २६, २०२२

चंद्रपूर महानगरपालिककेच्या निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट रोजी आरक्षण निघणार

चंद्रपूर महानगरपालिककेच्या निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट रोजी आरक्षण निघणार

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तारीख जाहीर 


औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या  निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.


औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे.




राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्गुस व नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

त्याअनुषंगाने, नगरपरिषद व नगरपंचायतीचे आरक्षण सोडत गुरुवार, दि. 28 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजता संबधित नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयात पार पडणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीचे आरक्षण सोडत इत्यादीपासून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यापर्यंतच्या कार्यवाही वर नियंत्रण ठेवण्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यात बल्लारपूर न.प करीता उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, वरोरा न.प. करीता उपविभागीय अधिकारी वरोरा, मुल न.प. करीता उपविभागीय अधिकारी मुल, राजुरा न.प. करीता उपविभागीय अधिकारी राजुरा, चिमूर न.प. करीता उपविभागीय अधिकारी चिमूर, नागभीड न.प. करीता उपविभागीय अधिकारी नागभीड व घुगुस न.प. करीता उपविभागीय अधिकारी चंद्रपूर तर भिसी नगर पंचायतीकरिता उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तरी, वरीलप्रमाणे आरक्षण निश्चित सोडतीच्यावेळी संबंधित नगर परिषद / नगर पंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

#election #Chandrapur

सोमवार, जुलै १८, २०२२

28 riders from across the country have already registered

28 riders from across the country have already registered

 50 cyclists likely in 1000km BRM


In the biggest endurance cycling event ever held in central India, Nagpur Randonneurs will host close to 50 riders from across the country for a 1000km BRM (brevet) on August 13.


So far, 10 riders from Chandrapur, nine from Nashik, seven from Nagpur and one from Aurangabad have registered for the annual event. At least another 15 riders from Nashik, Mumbai and Nagpur are likely to register by August 10, when the registrations close.


The BRM, which starts at Zero Mile at 5.30 am on August 13, will go to the Charminar city of Hyderabad via Yavatmal and return via Hinganghat.


The grand event will be flagged off by Municipal Commissioner and randonneur Radhakrishnan B.


The riders have 75 hours (3 days and 3 hours) to complete the BRM. The allotted time includes rest and chores, which means each participant has to ride a minimum of 300km per day.


For details, call Nagpur Randonneurs on 7756035130.




सोमवार, ऑगस्ट ३०, २०२१

“आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं उद्घाटन inaugurates Azadi ka Amrit Mahotsav lecture series

“आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं उद्घाटन inaugurates Azadi ka Amrit Mahotsav lecture series

 

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले उद्घाटन

अनेक राज्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या भारत देशाबद्दल युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Posted On: 30 AUG 2021 5:52PM by PIB Mumbai

मुंबई/औरंगाबाद, 30 ऑगस्ट 2021

 

अनेक राज्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या  प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज डॉ कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे हे बलिदान विसरता येणार नाही, त्यांचे स्मरण करतच आपल्याला भविष्यात वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

सध्या देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असल्याचं सांगताना त्यांनी येत्या काही दिवसात, भारत जगातील एक शक्तीशाली देश बनेल असा विश्वास व्यक्त केला. देशातील  भष्ट्राचार आणि दहशतवाद नष्ट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला गेल्या काही वर्षात उत्तम यश मिळाले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं जलील यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

केंद्र संचालक जयंत कागलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी व्याख्यानमालेची संकल्पना मांडली. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित वर्षभर चालणाऱ्या या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांचीस्वातंत्र्य लढ्याशी संबंधित  विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील.

औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाला येत्या एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त विभागाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या  ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खा. जलील यांच्या हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक,  तसंच समीक्षक आणि  श्रोते यांनी सांगितलेल्या आठवणी, या ई- पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड.


* * *

Jaydevi PS/AIR Aurangabad/D.Rane

Ministry of Information & Broadcasting

Union Minister Dr. Bhagwat Karad inaugurates Azadi ka Amrit Mahotsav lecture series organised by All India Radio Aurangabad

AIR Aurangabad to broadcast 100 episode series on Indian independence struggle from September 3

E-book on completion of 40 years of Regional News Unit of Aurangabad

Posted On: 30 AUG 2021 5:35PM by PIB Mumbai

Aurangabad, 30 August 2021

 

“There is a need to reignite the flame of patriotism in the youth of a country which is blessed with different states and diversity.” Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad said this while he was speaking at an event at All India Radio Aurangabad's Regional News Unit. He inaugurated the lecture series of AIR on Independence Day Diamond Jubilee Celebration - "Azadi ka Amrit Mahotsav". Under this initiative, the Regional News Unit of AIR Will broadcast the features based on the Indian independence struggle. This series will be broadcasted twice a week from September 3. AIR Aurangabad will broadcast 100 episode series every Tuesday and Friday at 06 35 PM on various topics.


Speaking at the event, Dr. Karad said that many sacrificed their lives for independence and we cannot afford to forget their supreme sacrifices. Dr. Karad expressed the need of valuing their contribution during our journey of development and progress. He expressed confidence in the progress of the country and said that India will soon become Global superpower. Mentioning the steps taken in counterterrorism by the Union government, Dr. Karad said that India achieved remarkable success in anti-terrorism operations during the last few years.


Member of Parliament from Aurangabad Shri. Imtiaz Jaleel was the Guest of Honour. He said that being a country of various religions, languages, caste, and creed, India is truly a diverse country and a perfect example of 'Unity in diversity. Shri Jaleel also said that the inclusion of Dr Karad in the union cabinet is a feather in the cap for Aurangabad city.


Meanwhile Dr. Karad and Mr. Jaleel also launched an E-book on completion of 40 years of Regional News Unit of Aurangabad. The E-book comprises of memories and experiences of Editors, News Readers and listeners and those who have contributed to the evolutionary journey of the Regional News Unit in the past 40 years.


Station Director Jayant Kagalkar presented the foreward at the beginning while Ramesh Jaibhaye, Asst. Director (News) presented the theme of the upcoming lecture series. Legendary News readers from the station including Avinash Paigude, Muqim Khan, and Laxman Pawar also attended the ceremony. News readers Aparna Adhyapak and Rajshree Pohekar anchored the event while Programme executive Namrata Phalke concluded the gathering with the vote of thanks.


शनिवार, ऑगस्ट २१, २०२१

आकाशवाणी आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा | quizmarathi

आकाशवाणी आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा | quizmarathi

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आणि एम.जी.एम. विद्यापीठऔरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा

 

औरंगाबाद: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आणि एम.जी.एम. विद्यापीठऔरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत दर मंगळवारी आणि गुरुवारी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत होणाऱ्या सकाळी ७ वाजून १० मिनिटाच्या बातमीपत्रात एक प्रश्न विचारला जाईल. याचवेळी हा प्रश्न आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागाच्या आकाश‍वाणी औरंगाबाद’ या फेसबुक पेजवर तसेच airnews_arngbad या ट्विटर अकाऊंटवर देखील विचारला जाई. श्रोत्यांनी या प्रश्नाचे उत्तर quizmarathi@gmail.com या इ-मेलवर पाठवायचे आहेत. याशिवाय फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्ये देखील उत्तर देता येईल. सर्वात प्रथम अचूक उत्तर देणाऱ्याला विजेता  म्हणून घोषित करण्यात येईल. इ-मेलफेसबुक अणि ट्विटर अशा तिन्ही गटातून प्रत्येकी एकाची विजेता म्हणून निवड  केली जाईल. विचारण्यात येणारे सर्व प्रश्न स्वातंत्र्य चळवळ तसेच स्वातंत्र्योत्तर भारतातील घटना आणि घडामोडींवर आधारि असतील.

ही प्रश्न मंजुषा स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. केवळ आकाशवाणी औरंगाबादमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेत एकदा विजेतेपद मिळालेल्या स्पर्धकाला पुन्हा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या बातमीपत्रात घोषित केला जाईल. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरही त्याची घोषणा केली जाईल.

 

स्पर्धेतील प्रत्येक विजेत्याला प्रमाणपत्र आणि एक पुस्तक सप्रेम भेट दिले जाईल. ही स्पर्धा वर्षभर सुरू राहणार आहे.

स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन वृत्तविभाग आकाशवाणी औरंगाबाद आणि एम जी एम विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.




रविवार, एप्रिल २५, २०२१

मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव सिलमवार यांचे निधन

मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव सिलमवार यांचे निधन






आज त्यांच्या मूळ गावी अंबाडी येथे अंत्यविधी


किनवट- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमदार भीमराव केराम यांचे खंदे समर्थक श्री विठ्ठलराव सिलमवार वय ७५ वर्ष यांचे आज पहाटे चार वाजता त्यांच्या मूळ गावी अंबाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी अंबाडी ता. किनवट येथे आज रविवार दिनांक २५ एप्रिल 2021 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे श्री विठ्ठलराव सिलमवार यांना अस्थमाचा जुनाट त्रास होता ते बऱ्याच दिवसापासून अन्न बंद केले होते.मृत्युसमयी ते ७५ वर्षाचे होते.श्री विठ्ठलराव सिलमवार हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी भाजपच्या तालुका किसान आघाडीचे तालुका संघटक सोबतच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग राहत होता.ते अंबाडीचे माजी सरपंच कैलाश सिलमवार,कृषि विभागातील राजु सिलमवार यांचे वडील तर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री रामलू सिलमवार यांचे मोठे बंधू होय.त्याच्या पच्यात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,दोनभाऊ,बहीण,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे श्री विठ्ठलराव सिलमवार यांच्या निधनाने अंबाडी गावावर शोककळा पसरला आहे.