Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २०, २०२१

दिवसभरात १६ जण दगावले #Chandrapur #covid19 #Update



गत 24 तासात 743 कोरोनामुक्त

1425 पॉझिटिव्ह तर 16 मृत्यू

Ø आतापर्यंत 32,024 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,207


चंद्रपूर, दि. 20 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1425 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44 हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 24 झाली आहे. सध्या 12 हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 64 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 85 हजार 107 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 56 व 65वर्षीय महिला, 58 व 76 वर्षीय पुरुष,बाबुपेठ येथील 65 वर्षीय पुरुष, गजानन महाराज चौक परिसरातील 36 वर्षीय पुरुष, रहमत नगर येथील 62 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी,नगीना बाग परिसरातील 55 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 41 वर्षीय पुरुष, तर ब्रह्मपुरी येथील 50 वर्षीय पुरुष, सरदार पटेल वार्ड, वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, वणी-यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष, बामणी येथील 45 वर्षीय महिला, भिसी-चिमूर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 588, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1425 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 445, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 104, भद्रावती 102, ब्रम्हपुरी 133, नागभिड 42, सिंदेवाही 43, मूल 65, सावली 23, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 21, राजूरा 59, चिमूर 41, वरोरा 207, कोरपना 40, जिवती 16व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.