Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १६, २०२१

काँग्रेस नेते रामू तिवारी यांचे मनपावर ताशेरे, गेल्या चौदा महिन्यात चंद्रपुरात एकही दवाखाना मनपाने काढला नाही: रामू तिवारी


चंद्रपूर/खबरबात:https://youtu.be/H9rRNf7W07M
डिसेंबर नंतर मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा मार्च येताच डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा चंद्रपूर शहरात वाढत जात आहे.अशातच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधा केल्या जात असल्या तरी मात्र त्या अपूर्ण पडत आहे.


 कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता गेल्या चौदा महिन्यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एकही दवाखाना व्यवस्थित उभारला नाही. चंद्रपूरकरांना त्यात उपचार घेता आले नाही. ऑक्सिजनची कमतरता व्हेंटिलेटरची कमतरता आणि रेमडीसिवर इंजेक्शनची देखील कमतरता आज चंद्रपुरात जाणवत आहे. रेमडीसिवर मेडिसिन प्रत्येकाला मिळावी यासाठी लोक गर्दी करू लागले आहेत. मात्र हे सर्व नियोजन करण्यास चंद्रपूर महानगरपालिका अपेशी ठरत आहे. असा आरोप चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.