Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २१, २०२१

महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे : मनसेप्रमुख राज ठाकरे

किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे



महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे

जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे, अशी मागणी मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. 

यावेळी ते म्हणाले, वाजे शिवसेना पक्षा मध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायला वाजेला कोण घेऊन गेलो होता, अजून हा प्रश्नच उत्तर मिळाले नाही. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की वाजेना पोलीस खात्यात घावे, याचा अर्थ एवढाच या वाझे शिवसेनेचे अध्यक्ष आणि आताचे मुख्यमंत्री यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या अत्यंत मधुर संबंध आहेत. मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?

मुळात परमबीर सिंग ह्यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली?

गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.