Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २३, २०२१

गत 24 तासात 104 कोरोनामुक्त ; 112 पॉझिटिव्ह



आतापर्यंत 24,242 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 1313

चंद्रपूर, दि. 23 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 112 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 968 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 242 झाली आहे. सध्या 1313 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 55 हजार 995 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 24 हजार 142 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

    जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 112 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 38, चंद्रपूर तालुका नऊ,  बल्लारपूर 10, भद्रावती नऊ, ब्रम्हपुरी आठ, नागभिड तीन,सिंदेवाही सहा, मूल पाच, सावली तीन, पोंभुर्णा एक, राजूरा तीन, चिमूर पाच, वरोरा पाच, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.