Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०८, २०२१

#Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार



 #नागपूर- राज्यात रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राज्यस्तरीय #महारेशीमअभियान गावपातळीवर राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे आयोजित रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवली.

महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार असून, या उद्योगाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सभा घेऊन शाश्वत उत्पन्न घेता येऊ शकते. शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यात येईल. शेतकऱ्यांनी या कालावधीत नागपूर जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी करावी-जिल्हाधिकारी

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग तसेच रेशीम संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात महारेशीम अभियान राबविण्यात येत असून, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरएफओंनी अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.