Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २१, २०२०

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

गडचिरोली  : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या  अनेक नद्या, उपनद्या तसेच नजीकच्या जिल्ह्यातील नद्या-धरणे यातून वेळोवेळी सोडणारे पाणी त्यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या  नद्यां‘ध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा म्हणून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करण्यासाठी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वयासाठी प्रशासनाकडून सर्व विभागांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या इंद्रावती नदी ही जगदलपूर स्टेशन (राज्य छत्तीसगड) येथे धोका पातळीच्या वर वाहत आहे. इंद्रावती नदी ही भामरागड तालुक्यातील कवंडे गावातून प्रवेश करुन पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे गोदावरी नदीस मिळते. सध्या नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता इंद्रावती नदीकिनारी गावांनी विशेष सतर्कता बाळगावी. संबंधित तहसिलदारांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तत्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा बॅरेज येथील वेळोवेळी सोडण्यात येणारे विसर्गामुळे (सध्या विसर्ग ४.२८ लक्ष क्युसेक्स) गोदावरी नदीच्या खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरेवला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागटृटा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी असा इशारा देण्यात आला आहे. इंद्रावती व गोदावरी नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोसेखुर्द धरणामधून वेळोवेळी सोडण्यात येणारे विसर्गामुळे (सध्या विसर्ग २.३९ लक्ष क्युसेक्स) तसेच पुढे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता वैनगंगा नदीकिनारी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी. तहसिलदार देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी यांना सदर भागांत वेळोवेळी अधिनस्त कर्मचाèयांकडून दवंडी द्यावी, तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तत्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.