Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २७, २०२०

मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल


बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर गृह अलगीकरण
नियमांचा भंग केल्याचे प्रकरण
चंद्रपूर, 27 जुलै : करोना टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर 14 दिवसांच्या गृहविलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक मजूरांना करोनाची लागन झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
मूल येथील साईकृपा राईसमील व ओमसाईराम राईसमिलचे संचालकांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मजूर आणतांना विलगीकरण तथा गृह अलगीकरण आदेशाचे सक्त पालन करावे, असे या दोन्ही राईसमिल मालकांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्याचा परिणाम या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक करोना बाधित मिळून झाले आहेत.
याप्रकरणी मूलचे तहसीलदार डी.जी. जाधव  यांच्या तक्रारीवरून साईकृपा व ओमसाईराम राईसमिलचे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जानाळा येथे 50 लोकांची परवानगी असतांना 130 पेक्षा अधिक लोकांना निमंत्रीत करून विवाह समारंभ साजरा करणाऱ्या आयोजका विरूध्दही यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रतिबंधीत क्षेत्राचे नियम न पाळणे, होम कॉरेन्टाइन असताना बाहेर पडणे, मॉस्क न वापरणे अशा पद्धतीने समाजाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.