Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०६, २०२०

जगप्रसिद्ध मोहूर्ली गावात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भीषण पाणी टंचाई



मोहर्ली येथे कोरोना काळात सामाजिक 
अंतराच्या नियमाला हळताल 
चंद्रपूर/(खबरबात):
जगात ओळख असणाऱ्या अशा चंद्रपूर जिल्ह्यातील मोहूर्ली येथील गावकरी मागील आठवडाभरापासून ग्रामपंचायत आणि संबंधित पाणी पुरवठा यंत्रणेच्या ढिसाळ आणि अनियोजित कारभारामुळे पेय जलासाठी त्रस्त झाली आहे.


ऐन कोरोना काळात गावात भिषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे,कोरोना संसर्गाची भीति असून सुद्धा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना सर्व नियमांना हरताळ फासून घरात पीण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचासाठा हा सार्वजनिक विहिरीवरून करावा लागत आहे. गावकरी सामाजिक अंतर न पाळता विहिरिवर पाण्यासाठी गर्दी करीत आहेत.

मोहूर्ली गावात मुख्यमंत्री पेय जल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामातील अव्यवस्था आणि संबधित विभागाच्या उदासीनतेमुळे सदर गंभिर स्थिती निर्माण झाली असून यावर त्वरित उपाययोजना करून पाण्याचा भिषण समस्येपासून गावकऱ्यांना मुक्त करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

विहिरीवर होणाऱ्या गर्दीमुळे गावात कोरोणाची भीती आजही कायम आहे. महिला मंडळी विहिरीवर घाबरत पाणी भरत आहेत. याकडे प्रशासनाच्या लवकरात लवकर लक्ष घातले नाही तर गावात देखील कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.