Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून २३, २०२०

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचविण्यासाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन

 बंदर कॉल ब्लॉक लिलाव यादीतून वगळण्याच्या
 मागणीकरिता इको-प्रो तर्फे मूक निदर्शन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनपासून अवघ्या सात किमी अंतरावरील बंदर कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याच विरोधात बंदर कॉल ब्लॉक लिलाव यादीतून वगळण्याच्या मागणीकरिता इको-प्रो तर्फे मूक निदर्शन केली. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रात लागून असलेल्या बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया तर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या 41 कोल ब्लॉक अंतर्गत या कॉल ब्लॉकचा समावेश आहे.

ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार आहे. यापूर्वीसुद्धा 2010 मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री जयराम रमेश यांची दिल्ली येथे भेट घेत इको प्रो शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात निवेदन देत सदर कोळसा खाणींमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा कोरडोर नष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धनाकडे लक्ष वेधण्यात आले होते. 
याची लगेच दखल घेत एन टी सी ए मार्फत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आले सोबतच एनटीसीए ची एक कमिटी सुद्धा बंदर कुठून कोल ब्लॉक क्षेत्रात पाठवण्यात आलेली होती. यानंतर ब्रह्मपुरी वनविभाग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तर्फे सदर कोळसा खान ताडोबा सोबतच व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सदर खान प्रकल्प धोकादायक असल्याचे नमूद केले होते. यापूर्वी सुद्धा 1999 मध्ये सदर कोल ब्लॉक ची परवानगी नाकारण्यात आलेला होता.

या खाणीमुळे ताडोबा-घोडाझरी मार्गाने उमरेड-कऱ्हाडला, नवेगाव-नागझिरा, पेंचमध्ये भ्रमण करणाऱ्या वाघांची वाट प्रभावित होणार असल्याची माहिती वन्यजीव प्रेमींनी दिली आहे ताडोब्याचे जंगल 'रॉयल बेंगॉल टायगर' या वाघांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक ११५ वाघ या प्रकल्पात असल्याचा अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे. 
ताडोब्याच्या दक्षिणेकडे खुल्या कोळसा खाणी तर पूर्व व पश्चिमेकडे गावे आहेत. त्यामुळे वाघांना या भागातून जाता येत नाही. घोडाझरीपर्यंतचा मुख्य मार्ग बंद झाल्यास हे सर्व वाघ गावाच्या दिशेने गेल्यास मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढीस लागणार आहे. 'गंभीर धोके बघता या बांदर कोल ब्लॉकला रद्द करण्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. तेव्हा तो रद्दही करण्यात आला होता. पण, नव्याने त्याला परवानगी देणे घातक आहे,' असे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी सांगितले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या, आवश्यक व्याघ्र अधिवास ची कमतरता, दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष, व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज असताना अशातच सदर कॉल ब्लॉक चा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे, यामुळे इको-प्रो संस्थेने निदर्शने करीत सदर 'बंदर कोल ब्लॉक' कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमिवर सदर निदर्शने करताना सोशल डिस्टन्स पाळून, मास्क चा वापर करित निदर्शने करण्यात आली. 
यावेळी बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात नितिन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, वैभव मडावी, सुमित कोहले, बिमल शहा, राजेश व्यास, अनिल अडगुरवार, राजू हाडगे, संजय सब्बनवार, अमोल उत्तलवार्, मनीष गावंडे, कुणाल देवगिरकर सहभागी झाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.