Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १७, २०२०

स्वराज एकता मंडळातर्फे अन्नदान वाटप

आठ दिवसापासून सुरु आहे स्त्युत्य उपक्रम 
नागपूर : अरूण कराळे:
तालुक्यातील वाडी येथील स्वराज एकता मंडळातर्फे बुधवार ८ एप्रील पासून समर्थ गजानन सोसायटीच्या श्री समर्थ गजानन महाराज मंदीराच्या प्रांगणात अन्नदान वाटप सुरू आहे . दररोज होणाऱ्या अन्नदान वाटपात ४०० गोरगरीब कामगार लाव्हा येथील महादेवनगर ,हिलटॉप कॉलनी , संतोषी माता नगर ,वाडीतील दत्तवाडी ,समर्थ गजानन सोसायटी ,हरिओम सोसायटी येथील भाग घेत आहे . या उपक्रमासाठी स्वराज एकता मंडळाचे अभय कुणावार ,अनील भाटीया ,सचिन कुटे ,नारायण केसरवाणी ,अविनाश हुद्दार ,जयंत सिंगरू ,राजा अय्यर,श्यामलाल सकलानी ,अरूण पगारे ,वल्लभ सकलानी ,विनोद पटले ,प्रभुदयाल देशमुख ,प्रमोद सकलानी ,मनीष गाडे ,सुनील बनकोटी आदी कार्यरत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.