Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २१, २०२०

'जनता कर्फ्यु' स्वयंस्फूर्तीने पाळा :महापौर संदीप जोशी

नागपूर/
 'कोरोना'चे संक्रमण वेळीच थांबावे आणि भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लोकांनी कुठेही घराबाहेर पडू नये. स्वतःवर निर्बंध लादून एक दिवस कर्फ्यु पाळावा, असे आवाहन केले आहे. नागपुरातील प्रत्येक नागरिकाने किमान स्वतःसाठी आणि कुटुंबियांच्या आरोग्यासाठी 'जनता कर्फ्यु' पाळावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. रविवारी २२ मार्चला कुणी बाहेर तर पडू नयेच, मात्र ३१ मार्च पर्यंत इतर दिवशीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळावी, अतिआवश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, गरज वाटल्यास डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.