Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०३, २०१९

पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूने वाचविले पुरात अडलेल्या शेतकऱ्याचे प्राण


ललित लांजेवार/
चार दिवसांपासून कोसळणऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.शनिवारी मूल तालुक्यातील चीचाळा गावालगत पूर आल्याने सकाळच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेलेल्या भाऊजी गुरूनूले वय वर्ष 84 हे पुराच्या पाण्यात अडकले . ह्या घटनेची माहिती गावकरांनी मूलचे   पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना दिली.

परिस्थितीचे गांभीर्य बघत ठाणेदार कासार यांनी लगेच चंद्रपूर जिल्हा पुलिस आपत्ति व्यावस्थाप कक्ष ल माहिती दिली व लगेच चंद्रपूर पोलीस आपत्ती टीम चे टीम चे कर्मचारी अशोक गरगेलवार, समीर चापले, दिलीप चव्हाण, उमेश बनकर , वामन नाक्षीने, गिरीश मरापे , मेकाशाम गायकवाड, मूल पुलिस स्टेशनचे पुलिस कांस्टेबल राजेश शेंडे यांनी त्यांना सुखरूप त्या पुराच्या पाण्यातून वाचवण्याचे काम केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.