Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २८, २०१९

चंद्रपूर / संपत्तीच्या वादातून मुलानेच केली शेतकरी वडिलाची हत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
वडिलांची हत्या साठी इमेज परिणाम
पैशाच्या लालसेपोटी मुलाने घरालगतच्याच शेतात वडिलाचा गळा आवळून खून केला व नंतर नैसर्गिक मृत्यूचा देखावा करून अंत्यसंस्कारही उरकल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी गावात २२ जुलै रोजी घडली. दरम्यान, बहिणीला याबाबत संशय आल्याने दोन दिवसानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्याने घटनेच्या चार दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. 

वडिलांनी मुलाला दिलेल्या रकमेचे काय केले ही विचारणा केली असता त्याने वडिलांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. २२ जुलैला २ साथीदारांना सोबत घेऊन रात्री साडेसात वाजता घराशेजारीच असलेल्या शेतात वडिलांचा गळा आवळून खून केला. राजेशने वडिलांचा मृत्यू आकस्मिक झाला असल्याचा बनाव करुन त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिली.मात्र मुलगी वैशाली दादाजी खोब्रागडे हिने भावाच्या कृत्याचा भांडाफोड केला, वडिलांचा मृत्यू आकस्मिक नसून हत्या करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दिली. 

यानंतर पोलीस तपासात मुलगा राजेश यानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.