Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १४, २०१९

महावितरणच्या भरती प्रक्रियेत ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही

नागपूर/प्रतिनिधी:


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणतर्फे ५ हजार वीज सहायकांच्या पदांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कुठलाही अन्याय झालेला नाही. एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुस-या वर्गाच्या रकान्यात छापल्या गेली. परंतु ही चूक लक्षात येताच ती लगेच सुधारण्यात आलेली आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

महावितरणने ९ जुलै रोजी रात्री १०.४० वाजता आपल्या संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये चुकीने ओबीसींसाठी ८१ जागा दर्शविण्यात आल्या होत्या. वस्तुत: आरक्षणाप्रमाणे १५०७ पद असायला हवे होते. काही वेळानंतरच ही चूक महावितरणच्या लक्षात आली. दुस-या दिवशी १.३५ वाजता सुधारित (शुद्धीपत्रक) जाहिरात प्रकाशित करण्यात आली. यात ओबीसींच्या १५०७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असल्याची सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे अन्यायाचा पश्नच येत नाही. 

दरम्यान अनेक ओबीसी संघटनांनी या विषयाला मुद्दा बनवला. ओबीसी आरक्षणाला छेडल्याचा आरोप करण्यात आला. परंतु हे सर्व केवळ एका त्रुटीमुळे झाले असून ती सुधारण्यात आली आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.