Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १५, २०१९

वंचित आघाडीच्या नावाखाली बहुजनांची दिशाभूल


नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद

नागपूर - बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या नावाखाली अलुतेदार आणि बलुतेदार समाजाच्या लोकांची मते मागून दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्वतःच्याच जाणीवपूर्वक चुकांमुळे वंचित आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायकरित्या खाली कोसळेल, अशी खदखद त्यांनी मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर ऐन मतमोजणीच्या तोंडावर व्यक्त केली.
यावेळी मिलिंद पखाले म्हणाले, 2015 ते 2017 या जवळपास तीन वर्षे राबविलेल्या काळात जाती अंत होईल अशी अपेक्षा होती. पंरतु, स्वहित जोपासण्याकडे लक्ष आणि दुरद्रुष्टीचा अभाव असल्यामुळे वंचित आघाडी बोगस ठरली. डॉ . बाबासाहेब आंनेकांनी आम्हाला माणूसपण दिले. ते माणूसपणच आज धोक्यात आले आहे. ते माणूसपण हिरावून घेण्यासाठी प्रतिक्रांतीचे एक एक पाऊल पडत आहे. अशी आजची परिस्थीती भयावह झाली आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. आंबेडकरी समाजाच्या अनेक प्रश्नांनवर वंचित बहुजन आघाड़ी एक ही शब्द बोलत नाही. गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील मागील 35 वर्ष तयार झालेला आंबेडकरी भारिप बहुजन महासंघ बरखास्त करून सरसकट संपविला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.