Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १७, २०१९

ताडोबातील वाघिणीच्या शिकारप्रकरणी तिघांना अटक

ललित लांजेवार/चंद्रपूर: 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाला अखेर यश आले आहे. 

चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात कोर झोनमध्ये मागील 5 दिवसांपूर्वी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणात तपास टीमने तीन आरोपींना अटक केली आहे.  आरोपींमध्ये खातोडा येथील एका वनमजुराचाही समावेश असल्याची माहिती आहे. या तिनही आरोपींना  न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत वन कोठडीत रवानगी केली आहे.

वाघाच्या शिकारीच्या या घटनेनंतर वन विभाग हादरून गेले होते.या घटनेनंतर आरोपीच्या शोध सुरू असताना सोमवारी  शिकाऱ्यांचा सुगावा लागला. तो शिकारी खातोडा तपासणी नाक्यावर काम करणारा वनमजुरच निघाला. अमोल आत्राम (२३) रा. खुटवंडा असे त्याचे नाव आहे. त्याची कसून चौकशी केली असता तो शिकाऱ्यांचा खबरी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने सुरेश कन्नाके उर्फ कुमरे (२९) रा. पळसगाव (शिंंगरू) तसेच रमेश मसराम (४१) रा. पळसगाव (शिंंगरू) या दोघांची मुख्य शिकारी म्हणून नावे उघड झाली.

सदर तीनही आरोपींना वन विभागाने अटक करून वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार वन्यजीवांची अवैध शिकार करणे, वन्यजीवांच्या अधिवासाला धोका पोहचविणे, जंगलात विना परवाना शस्त्रासह प्रवेश करणे आदी कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना भद्रावतीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.