साडेतिन महिन्याचे आमदार- काय साधणार विकास
कोंढाली वार्ताहर - केवळ साङेतीन महीन्यासाठी औटघटकेच्या काटोल विधानसभा मतदार संघा साठी आमदार पदासाठी पोटनिवडनुक होत आहे .तशी अधीसुचना जाहीर होउन 11एप्रीलला निवडनुक लोकसभेसोबत होनार आहे.भाजपा चे माजी आमदार आशीष देशमुखांनी राजीनामा दिला त्या नंतरच भंडारा गोंदीया लोकसभेच्या पोटनीवडनुकी सोबतच निवडनुक जर झाली असती तर कमीतकमी नउ महीन्याचा आमदार होउन विकास करता आला असता. आता तर शपथ विधी होते नाही तोच सप्टेबर महिन्यात विधान सभेच्या सार्वत्रीक निवडनूका संपन्न होणार? आहे. निवडनुक आयोगाला रिक्त पदावर सहा महिनेच्या आत निवडनुक घेने आवश्यक असते.
परंतु काटोल नरखेड भागात तेव्हा दुष्काळ होता म्हनुन निवडनुक घेतली नाही आणि आताही सरकारने दुष्काळ जाहीर करुनही मदत न करताच पुन्हा लोकसभे सोबतच काटोल विधानसभेची निवडनुक जनतेवर लादुन काय साध्य केले? निवडनुकीचा अप्रत्यक्षपने जनतेवर भुर्दंड बसनार असुन काटोल-नरखेड भागातील मतदार याविषयी नाराज आहे. तसेच या निवडनुकीने जनते चे प्रश्न तर सुटनार नाही मात्र या औटघटकेच्या आमदारांचे आयुष्यभर पेंशन वर लाखोंचा भुर्दंड सरकारवर निवडनुक आयोग लादत आहे एवढ मात्र खरे!
तेव्हा काटोल विधानसभा निवडनुकीचा खेळ खंडोबा न करता पोटनिवडनुक रद्द करावी.असे काटोल जिल्हा कृती समीतीचे अध्यक्ष संजय डांगोरे यांनी एका प्रसीद्धीपत्रकाद्वारे केलेली आहे.