Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

नागपूर विमानतळावर हायअलर्ट


नागपूर/प्रतिनिधी:  
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.एअर इंडीयाच्या कार्यालयात फोन करत अज्ञाताने एअर इंडीयाचे विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमातळांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

एअर इंडीयाच्या कॉलसेंटरमध्ये फोन करून तुमचे विमान हायजॅक करून ते पाकिस्तानात नेऊ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर याची माहिती गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली आहे. तर देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच विमातळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच पार्किंगमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी कऱण्यात येत आहे.

ब्युरो ऑफ सिवील एविएशन सिक्यूरिटी (BCAS) कडून सर्व विमानतळांना खबरदरीचा इशारा देण्यात आला असून टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापुर्वी कसून तपासणी करण्याचे तसेच कर्मचारी, प्रवासी, कॅटरिंग यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विमानतळावर प्रवाशांची नियमितऐवजी बॅगची कडक तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळ परिसरात गस्त वाढविण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष शाखेला दिले. विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मला देवी यांनी विमानतळ परिसर व मार्गावर सुरक्षा वाढवण्यासह अतिरिक्त गस्त घालण्याचे निर्देश सोनेगाव पोलिसांनी दिले. याशिवाय संशयास्पद व्यक्ती व वाहनांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.तसेच नागपुरात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी  तरुणांच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान विशेष शाखेने सर्वच पोलिस स्टेशनला काश्मिरी तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.