Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

कोलामगुड्यावर ध्वजारोहणानंतर धरणे

चंद्रपूर/प्रतिनिधी
 जिवती तालुक्यातील खडकी या दुर्लक्षीत कोलामगुड्यावर ध्वजारोहण
करण्यात आले. माणिकगड पहाडावरील हे गाव इंग्रज राजसत्तेपासून आजतागायत ग्रामपंचायतीचे ठिकाण आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतेक ही एकमेव ग्रामपंचायत असावी जीथे ग्रामपंचायतीचे कार्यालय नसावे. याचे कारण केवळ तीन किलोमीटर लांबीचा रस्ता. गेल्या 72 वर्षात या गुड्याला रस्ता मिळाला नाही म्हणून कधीकाळी सातशे घरांची असलेली ही वस्ती आता सोळा घरांची राहीली आहे. अतीशय खरतड जीवन जगणा-या या कोलामगुड्यावर विकासाची गंगा पोहोचलीच नाही.
अशा या उपेक्षित कोलामगुड्यावर जैतू पाटील कोडापे यांनी ध्वजारोहण केले. यानंतर कोलाम गुड्यावरील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेत्रुत्वात धरणे देण्यात आले.
दुपारी एक वाजता शेतकरी नेते अँड. वामनराव चटप यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी सुपरीचित साहित्यिक, कवी प्रा. वाकुडकर यांनी 'आता तरी उगवेल का कोलामगुड्यावर स्वातंत्र्याचा सुर्य' या विषयावर मार्गदर्शन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.