Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ३१, २०१८

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांची आता खैर नाही

चंद्रपूर /प्रतिनिधी:
रिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरोधात राज्यभरातमहावितरणच्या वतीने दि. 01सप्टेंबर 2018 पासून विशेषमोहिम राबविण्यात येणारअसून यात संबंधित ग्राहकांसहरिमोटची निर्मिती करणाऱ्याकंपनी विरोधातही कठोरकारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीनेवीजचोरीवर आळाघालण्यासाठी सातत्याने विविधउपाययोजना करण्यात येतात.वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्णराज्यात विशेष मोहीम राबवूनमोठया प्रमाणात कारवाईकरण्यात येते. परंतूअलीकडच्या काही वर्षातरिमोटद्वारे वीजचोरी होतअसल्याचे आढळून आले आहे.याबाबत मुंबईत आज दि. 30ऑगस्ट 2018 रोजी झालेल्यासंचालक मंडळाच्या बैठकीतअशा वीजचोरीच्या विरोधातविशेष मोहीम राबविण्याचा वकठोर कारवाई करण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. हीमोहीम दि. 01 सप्टेंबर 2018पासून संपूर्ण राज्यातराबविण्यात येणार आहे. यामोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरीकरणारे ग्राहक तसेच संबंधितकंपनीविरोधात कठोर कारवाईकरण्यात येणार आहे.
रिमोटद्वारे वीजचोरी होतअसल्याचे निदर्शनास आल्याससंबंधितांनी महावितरणलात्याची माहिती द्यावी. अशावीजचोरीची माहिती देणाऱ्यांनावीजचोरीच्या अनुमानितरक्कमेच्या 10 टक्के रक्कमरोख स्वरुपात बक्षीस म्हणूनदेण्यात येते. तसेच अशीमाहिती देणाऱ्याचे नाव देखीलगुप्त ठेवण्यात येते. त्यामुळेअशा वीजचोरीची माहितीदेण्याचे आवाहन महावितरणनेकेले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.