Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १४, २०१८

खापरीच्या गावकरी व विद्यार्थ्यांनी मागणीसाठी अडविली बस

कारंजा (घा.)/उमेश तिवारी
कारंजा घाडगे दि १४ ऑगस्ट कारंजा तालुक्यातील खापरी गावात बस नेण्यात यावी या रास्त मागणीसाठी खापरीच्या गावकरी व विद्यार्थ्यांनी बस अडविण्याची घटना आज मंगळवारी १४ ऑगष्टला दुपारी १२ वांजताचे दरम्यान घडली.कारंजा बसस्थानक प्रमुख शिरपुरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकरी विद्यार्थ्यांची समस्या ऐकून घेतली.माणिकवाडा ते कारंजा रस्त्यावर सावरडोह पासून सहा किलोमीटरवर तुंबडीवाल्यांचे गाव म्हणून ओळख असलेले खापरी हे खेडेगाव आहे.खापरी येथील दहा ते बारा मुलेमुली  कारंजा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज सकाळी येतात व दुपारी १२  वाजेनंतर महाविद्यालय सुटल्यानंतर खापरीला परत जातात.सकाळी खापरी ते सावरडोह पर्यंत सहा किलोमीटर आठ नऊ मुली व काही मुले पहाटेच्या धुक्यात उपाशीपोटी पायदळच येतात व दुपारी  बाराचे दरम्यान कारंजावरून सावरडोह पर्यंत बसने येऊन पुन्हा सहा किलोमीटर उपाशीपोटीच खापरीला जातात. खापरी येथे  पुढे बस जात नसल्याने त्यांना पासेस सुध्दा सावरडोह ते कारंजा व कारंजा ते सावरडोह पर्यंतच काढाव्या लागतात.कधीकधी कामधंदा सोडून पालक सावरडोह पर्यंत पहाटेलाच पोहचऊन देण्यासाठी धावपळ करीत असतात.विद्यार्थ्यांना खापरी पर्यंत सुखरूप पोहोचता यावे म्हणून सकाळची माणिकवाडा ते कारंजा व दुपारची कारंजा ते साहूर बस खापरी गावापर्यंत नेण्यात यावी व विद्यार्थ्यांची उपाशी पोटी होणारी गैरसोय टाळण्यात यावी या मागणीसाठी आज बस  अडविण्यात आली.परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेण्यात यावीअशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.