Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०५, २०१८

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली रहिवास्याची हत्या

गडचिरोली/प्रतिनिधी: 
माओवाद्यांकडून एकाची हत्या करण्यात आलीये. माओवाद्यांकडून गोळ्या झाडून ही करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील होरेकसा येथील रहिवासी असलेल्या पांडुरंग पदा यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीये. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होत्या. दरम्यान आता नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण गडचिरोलीत निर्माण झालंय.
शुक्रवारी  रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ३० ते ४० सशस्त्र नक्षलवादी पांडुरंगच्या घरी गेले. त्यांनी पांडुरंगला झोपेतून उठवून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेले आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 
घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकल्याचे आढळून आले आहे. ८ मे २०१६ रोजी जहाल नक्षलवादी व चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. तिची माहिती पांडुरंग पदा यानेच दिली, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.