Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०७, २०१८

अस्वलीच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू: तर प्रतीउत्तरात अस्वलीचा मृत्यू

भद्रावती/प्रतिनिधी: 
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणी करत असतांना दबा धरून बसलेल्या अस्वलीने बांबू कापणी करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविला यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन मजूर गंभीर रित्या जखमी झाले आहे.हि घटना बुधवारी दुपारच्या  सुमारास घडली.  यात मजुरांनी अस्वलीपासून स्वरक्षण करतांना प्रतीउत्तारात त्या अस्वलीचा मृत्यू झाला. 
भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणीचे काम सुरु होते त्यासाठी मध्यप्रदेशातून बांबू कापणीसाठी मजूर वर्ग चंद्रपूर जिल्ह्यात आले होते.सकाळच्या सुमारास कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कटाईचे काम सुरु असतांना लपून बसलेल्या अस्वलीने हल्ला केला यात धरमसिंग टेकाम ( रा. बालाघाट ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रेमलाल सयाम आणि संबल सिंग नामक २ मजूर गंभीर जखमी आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मजुरांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात अस्वल ठार झाले.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.