Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ३१, २०१७

कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण जन संपर्क कार्यक्रम संपन्न

ब्रम्हपुरी ग्रामिण प्रतिनिधी :- 
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या आवळगाव येथे कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण कार्यक्रम ग्राम पंचायत येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजने अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
ज्या शेतकऱ्यांच वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मनाला दिलासा देणारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 जाहीर करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना  दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून शेतकऱ्यांनी ३१डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून त्वरित भरना करावा व ज्यानी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच सन्मान करण्यात आला.जे शेतकरी आपल्या विधुत बिलाच भरना करत नसेल तर त्यांची विधुत खंडित केला जाईल.
तसेच कृषि पंप धारकांच्या तक्रारी असतील त्यानी त्वरित माहिती कनिष्ट सहाय्यक अभियंता कार्यालयाला द्यावे. अशी माहिती कृषीपंप शेतकऱ्यांना मा .श्री.लिखार साहेब उपविभागीय अभियंता ब्रम्हपुरी यानी  दिली.
या कार्यक्रमाला सौ.ज्योती अश्वजीत जनबंधु सरपंच ग्राम पंचायत कार्या.आवळगाव, कनिष्ठ सहा.अभियंता मा.श्री.रामटेक्कर साहेब गांगालवाड़ी.डोंगरे साहेब ब्रम्हपुरी वरिष्ट तंत्र.मसराम व गावातील कृषिपंप  धारक.यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.