Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १७, २०१०

भाववाढीने लस्सीही महागली

चंद्रपूर - दूध आणि साखरेच्या भाववाढीमुळे सकाळच्या चहाची चव कडू झाल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या दाहकतेला कमी करण्यासाठी मागणी असलेली लस्सीही महागली आहे. साखर 40 रुपये किलो, तर दूध 30 रुपये लिटर झाल्याने लस्सीचा ग्लास 20 रुपयांपर्यंत पोचला आहे.

मकरसंक्रांत संपली आणि सूर्याची तप्त किरणे आग ओकू लागली आहेत. रंगपंचमीपासून त्याची तीव्रता आणखीनच वाढू लागली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगार मिळविणारी शहरातील शीतपेयांची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा महागाईचा फटका बसत आहे. यंदा साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर आभाळाला पोचले आहेत. त्यामुळे त्यापासून तयार होणारी थंड आणि गरम पेय महागली आहेत. चहाच्या कपाचे दर चार ते सहा रुपयांपर्यंत गेल्यानंतर अनेकांची जीभ कडू झाली. आता उन्हाळ्याच्या दिवसांत ही रक्कम थंडपेयांच्या माध्यमातून वसूल होणार आहे. चंद्रपूर शहरात गांधी चौक, श्रीकृष्ण टॉकीज, जटपुरा गेट येथील लस्सी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील दर ग्लासाच्या आकारानुसार वेगवेगळे आहेत. गांधी चौकात 10 आणि 15 रुपये ग्लास, श्रीकृष्ण टॉकीजसमोर 20 ते 25 रुपये, तर जटपुरा गेट परिसरात 12 ते 18 रुपये ग्लास असे दर आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पाच रुपयांनी भाववाढ झालेली दिसून येते. दुधाची वाढती टंचाई आणि भाववाढीमुळे दही महागले आहे. शिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढत आहेत. याशिवाय बर्फाच्या किमती वाढत आहेत. बर्फाची एक लादी 300 रुपयांची असल्याने एका तुकड्याची किंमत 30 रुपये मोजावी लागत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.