Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

श्रमिक एल्गार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रमिक एल्गार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

 ‘बस द्या बस’;बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

‘बस द्या बस’;बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

Student's Elgar for the bus | बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गारमूल/प्रतिनिधी:
 येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बसगाड्या अनियमित सुटत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी या मार्गावरचे विद्यार्थी सकाळी ७.३० वाजतापर्यंत मूलला पोहचतील, तर दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता व बुधवारी ३ वाजता मूलवरून नियमित बसगाड्या सोडाव्या. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच पास संपल्याचे सबब देत विद्यार्थ्यांची पास बंद करण्यात येत असल्याने पासची मुद्दत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
परिवहन मंडळाच्या अधिकाºयांनी सर्व मार्गावर बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक एस. व्ही. डफळे, वाहतूक अधीक्षक ए. बी. बोबडे, वाहतूक निरीक्षक एच. बी. गोवर्धन, वाहतूक निरीक्षक एस. सी. मेघावत, मूलचे वाहतूक नियंत्रक एन. डी. पठाण यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, अमित राऊत, गौरव श्यामकुळे, अमर कड्याम, रवि शेरकी, शहनाज बेग, विशान नर्मलवार, संगिता गेडाम उपस्थित होते.

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

मजूरीसाठी कार्यालयातच ठो​​​कणार मुक्काम

मजूरीसाठी कार्यालयातच ठो​​​कणार मुक्काम

मजूरीसाठी मजूरांचा असोलामेंढा  प्रकल्प कार्यालयात ठिया

      गोसीखुर्द प्रकल्पात मजूरीचे कामे करणा—या मजूरांचे लाखो रूपये बळकाविण्यांचा प्रयत्न करणा—या के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मजूरी काढून द्यावी या मागणीसाठी देउळगांवच्या मजूरांनी आज मूल येथील गोसीखुर्द प्रकल्प कार्यालयात श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात ठिया आंदोजन सुरू केले असून, मजूरी मिळेपर्यंत कार्यालयातच मुक्काम ठोकण्यांचा निर्धार केला आहे. 
श्रमिक एल्गारच्या महासचिव छाया सिडाम, संगीता गेडाम यांचे नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.आंदोलनाला मूलचे उपविभागीय अधिकारी खेळकर, तहसिलदार सरवदे यांनी भेट देवून मजूरांच्या मागण्या रास्त असल्यांचे मान्य करीत, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
एप्रिल 2017 मध्ये देउळगांवच्या 8 मजूरांनी गोसीखुर्द प्रकल्पातील नहरावर डांबर फिलींगचे काम केले. काम  पूर्ण झाल्यानंतरही के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीने मजूरांची मजूरी देण्यांस टाळाटाळ केली.  'आम्ही मजूरी देणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा' असा दमही या कंपनीच्या अधिका—यांनी दिल्यांने, या मजूरांनी मजूरी काढून देण्यांसाठी श्रमिक एल्गारकडे धाव घेतली.  या मजूरांची मजूरी देण्यात यावी अशी कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालय, मूल यांचेकडे श्रमिक एल्गारने  मागणी केली, मात्र ही बाब कंत्राटदाराची असल्यांचे सांगून कार्यकारी अभियंता बगमारे यांनी आपले हात झटकले. कंत्राटदारांनी, या मजूरांना, आपला बील निघाला नसल्यांचे कारण सांगून, आपले हात झटकले.
दिनांक 7 डिसेंबर रोजी श्रमिक एल्गारने बगमारे यांना घेराव करताच, त्यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी संबधीत कंत्राटदारास लेखी पत्र देवून, कार्यालयात येवून प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे आदेश दिलेत, मात्र लेखी पत्राप्रमाणे कंत्राटदार हजर झाले नाही. कार्यकारी अभियंता बगमारे आज कार्यालयात आले नाही.  कंत्राटदार व आपण हजर राहू शकणार नाही याची पूर्वसुचनाही त्यांनी या मजूरांना किंवा प्रशासनाला न दिल्यांने मजूरांनी मजूरीसाठी कार्यालयात आले. कंत्राटदार व कार्यकारी अभियंता जोपर्यंत मजूरी देत नाही, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली.  
सायंकाळी तहसिलदार सरवदे यांनी या मजूरांची भेट घेवून, मजूरांवर अन्याय होत असल्यांची भावना व्यक्त करीत, सकाळ पर्यंत मजूरी देण्यांची कार्यवाही करण्यांचे आश्वासन दिले.मजूरांची मजूरी मिळावी यासाठी पोलिस प्रशासनही प्रयत्न करीत आहेत.

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

श्रमिक एल्गारची शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडक

श्रमिक एल्गारची शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडक

मूल/प्रतिनिधी:
 मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या  मागण्या घेवुन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात मुल येथील वनपरीक्षेत्र कार्यालयवर माेर्चा काढण्यात आला. अँड पाराेमिता गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या गंभिर समस्यावर प्रकाश टाकत शेतकरी शेतात रात्राे बे रात्राे डुक्करांसाठी शेतात जागली जातात त्याचीमाेर्चा राेजी सरकारने राेजगार हमी मधुन द्यावी. तसेच शेतकरी डुक्कर मारला तर त्याचेवर फाँरेस्ट ने गुन्हा दाखल करु नये स्वरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरीकाला आहे हेही माेर्चातुन आपल्या भाषनात ठनकावुन सांगीतले. यावेळी शेतकरी तथा श्रमिक एल्गारचे माजी तालुका अध्यक्ष अरुन जराते, श्रमिक एल्गारचे मुल तालुका अध्यक्ष रवि शेरकी यांनी शेतीची बिकट परीस्थीती कथन केली. तर घनश्याम मेश्राम महासचिव श्रमिक एल्गार, विजय सिद्धावार उपाध्यक्ष श्रमिक एल्गार यांची भाषने झाली . एल्गार आँफीस ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा माेर्चा काढण्यात आला. माेर्चात मुल तालुक्यातील टेकाडी,डाेंगरगाव, पडझरी, चितेगाव, येजगाव, चिखली, पिपरीदिक्षित, चकबेंबाळ, येरगाव , जानाळा, चिराेली येथिल शेकडाे शेतकरी बांधव माेर्चात सहभागी झाले हाेते. १ ) वन्य प्राण्यापासुन हाेत असलेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी २) रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यात यावा. ३) शेतकऱ्यांना माेफत साेलर कुंपन देण्यात यावा. ४) ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडाची व्यवस्था करण्यात यावी. या प्रमुख मागण्या माेर्चातुन  शासनाकडे करण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका सचिव दिनेश घाटे, संगीता गेडाम, विशाल नर्मलवार, रश्मा गेडाम, रानी भाेयर, यांनी परीश्रम घेतले.  उपस्तितांचे आभार मानुन माेर्चा राष्ट गिताने समाप्त करण्यात आला.

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

मूल/ प्रतिनिधी -गिरीश महाजन यांनी शहादा येथे महिला विरोधी भाष्य केले आणि दारू ला महिलांची नावे दया असे विधान केल्यानंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अड.पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसात महाजन विरुद्ध तक्रार दाखल केली होती.  दाखल केलेल्या  तक्रारींवर मूल पोलिसांनी कोणतीही कारवाही न केल्याची गंभिर दखल राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत  मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत शिवाय मूल पोलिसांना विचारणा करणार आहेत.काल एका दुरचित्रवाहिनी वरील चर्चेत संस्थेच्या अध्यक्षा अड. पारोमिता गोस्वामी यांनी महिलांचा एवढा धडधडीत अपमान झाल्याची तक्रार मूल पोलिसांना दिल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला नाही किंवा  अदखलपात्राची नोंद घेतली नाही. ही बाब पुढे आणताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत मुखमंत्राशी यावर बोलू व मूल पोलीसांना जाब विचारू असे जाहिर केले.यासोबतच ज्या दारूचे नाव महिलांच्या नावाने आहे अशी नावे देखील बद्दलवणास भाग पाडू असे यावेळी बोलत असताना सांगितले.
 सविस्तर वृत्त 

रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७

दारूसंपदेसाठी महाजनकी

दारूसंपदेसाठी महाजनकी

महिलांचा अपमान करणा-या गिरिश महाजन मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

मूल/प्रतिनिधी -
दारूचा खप वाढविण्यांसाठी दारूला महिलांचे नांवे द्या अशी मागणी करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधात अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसांत तक्रार दाखल केली असून, महाजन यांची मागणी ही संविधानाचे विरोधात असल्यांने त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे.

मूल पोलिसांनी मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधातील तक्रार दाखल करवून घेतली असून, कायदेशीर सल्ला घेवून पुढील कारवाई करण्यांचे मान्य केले आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे उस गाळप हंगामात मंत्री गिरीष महाजन यांनी, ‘दारूचा खप वाढवायचा असेल तर, दारूला महिलांची नांवे द्या’ असे वक्तव्य केले.  सार्वजनिक कार्यक्रमात दारूसारख्या घाणेरड्या पदार्थाची खप वाढविण्यासाठी महिलांचे नांवे देण्यांस प्रोत्साहन देणे हा महिलांचा अपमान असल्यांचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

राज्यातील महिला एकीकडे दारूबंदीसाठी आंदोलन करीत असतांना, राज्यातील मंत्री मात्र दारू वाढली पाहीजे यासाठी भूमिका घेत आहेत हे निशेधार्ह आहे.

संविधानाच्या अनुच्छेद 47 नुसार राज्यांनी दारूबंदीच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक असतांना, संविधानाचे रक्षण करण्यांसाठी मंत्रीपदाची शपथ घेणारे मंत्री महाजन मात्र संविधानातील तरतुदीच्या विसंगत भूमिका घेतल्यांने त्यांनी संविधानाचाही अपमान केला आहे.  त्यामुळे त्यांचे विरोधात राज्यपाल यांचेकडे तक्रार करून त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावी अशी मागणी श्रमिक एल्गारने केली आहे.  या गंभीर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गिरीश महाजन प्रकरणी भूमिका जाहीर करावी अषी श्रमिक एल्गारची मागणी आहे.

वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर त्याच्या प्रभावी अमंलबजावणीची मागणी होत असतांना, ज्यांचा या खात्याशी संबध नाही, अशा व्यक्तीने महिलांचा अपमान करणारे वक्तव्य महाराष्टासारख्या पुरोगामी राज्याला अस्वस्थ करणारे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याअभावी रोवणी झालेली नाही.  अनेक धरणे 25 टक्केही भरली नाही, गोसीखुर्दचे नहराचे कामे अजूनही पूर्ण झालेली नाही. शतक—यांना सिंचनासाठी पाणी पाहीजे असतांना, ते न वाढविता, सबंध नसलेल्या खात्यांचे मंत्री गिरीश महाजन यांना राज्यात दारू कशी वाढेल याची चिंता आहे. हे निशेधार्ह आहे.