Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

अवैध दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला झाली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

अवैध दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला झाली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

 25 हजार रुपये दंड 
Image result for दारू तस्करी कारावासाची शिक्षाचंद्रपूर/प्रतिनिधी:
 पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत हिरापुर येथे अवैध दारूची वाहतुक करून विक्री करणाऱ्या आरोपीस 19/09/2018 रोजी श्री. छल्लानी, न्यायदंडाधिकारी कोर्ट चिमुर, जि.चंद्रपुर यांनी शिक्षा ठोठावली.
दिनांक 05/09/2015 रोजी भिसी अंतर्गत शंकरपुर चौकी येथील पाेलीसांना गापनीय माहिती मिळाल्यावरून अवैधरित्या दारूची तस्करी करीत असतणाऱ्या  दोन  आरोपी नामे आषिश रामराव नैताम रा. पेंढरी ता.           सिंदेवाही,(राजु  नामदेव मडावी रा.नवरगाव ता. सिंदेवाही यांना दारूच्या मुद्दे मालासह अटक करण्यात आले.  यावरून पोलीस स्टेशन  भिसी येथे गुन्हा नोंद  करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस 
हवा. बद्दारखॉं पठाण आणि पा. रामचंद्र चाफले यांनी पुर्ण करून आरोपी विरूद्ध सबळ पुराव्यानिषी न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 19/09/2018 रोजी आशिष रामराव नैताम रा. पेंढरी ता. सिंदेवाही राजु  नामदेव मडावी रा. नवरगाव ता.सिंदेवाही यांना  3 वर्श सश्रम कारावासीची शिक्षा  व 25,000/-रू दंड, न भरल्यास 6 महिने कारवासाची शिक्षा श्री.छल्लानी, न्यायदंडाधिकारी कोर्ट चिमुर, जि. चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. संजय ठावरी, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर यांनी काम पाहीले असुन कोर्ट  पैरवी म्हणुन सफौ. सुधाकर बुटके पोस्टे. चिमुर, यांनी काम पाहिले.

शनिवार, जुलै २१, २०१८

अवैध दारूसाठा प्रकरणात न्यायालयाने ठोठावली ३ पोलिसांना ३ वर्षाची शिक्षा

अवैध दारूसाठा प्रकरणात न्यायालयाने ठोठावली ३ पोलिसांना ३ वर्षाची शिक्षा


नागपूर/ललित लांजेवार: 

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ रोजी ६०० करोडाच्या मह्सुलावर पाणीसोडत सुधीर मूनगंटीवार यांनी दारूबंदी केली .दारूबंदी झाल्यानंतर पोलीस यंत्रणेवर अंमलबजावणीची जबाबदारी आली.अश्यातच अवैध दारू पकडण्यासाठी पोलीस विभागाने विशेष पथक तयार केले.
मात्र रक्षक समजल्या जाणाऱ्या पोलिसांनीच अवैध दारूच्या कारवाया करत दारू पकडली अन तेच दारू भक्षक झाले.पोलिसांनी जप्त केलेल्या दारूपैकी काही दारू हि पथकातील पोलिसांनी क्वार्टर मध्ये ठेवली. 
ऑगस्ट २०१५ मध्ये राजुरा पोलीस ठाण्यात या प्रकारात एक तक्रार दाखल करण्यात आली ज्यात पोलिसांनी पोलीस क्वार्टरवरच पोलीस पथकाने धाड घातली असता हे क्वार्टर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील कर्मचा-याचेच निघाले. यात ३२ बाटल्या दारू आढळून आली होती. दारूबंदीनंतर लगेच काही महिन्यात थेट पोलीस अधिका-याच्या पथकातील कर्मचारी दारूसाठा बाळगल्याप्रकरणी कारवाईत अडकल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी ३ पोलीस कर्मचा-याना निलंबित केले होते. या प्रकरणी न्यायालयीन खटला चालविण्यात आला या खटल्याचा निकाल तब्बल ३ वर्षानंतर शुक्रवारी लागला.
यात राजुरा येथील प्रथम न्यायदंडाधिका-यांनी कठोर आदेश पारित करत रमेश आत्राम,विजय उइके, हेमंत बावणे या तीन पोलिसांना ३ वर्षांची शिक्षा व २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. अशा प्रकारच्या कारवाईत अशी कठोर शिक्षा होण्याची ही पहिली घटना असून या निर्णयाने पोलीस यंत्रणा देखील चांगलीच हादरली असून या नंतरच्या देखील पोलिसावर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दिलेली शिक्षेची पुनरावृत्ती देखील घडू शकण्याची संभाव्यता नाकारता येणार नाही.
rajura-700

रविवार, जून ०३, २०१८

आता विद्यार्थ्यांना शिक्षा करता येणार नाही

आता विद्यार्थ्यांना शिक्षा करता येणार नाही

punishment student school साठी इमेज परिणाममुंबई/प्रतिनिधी:

शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता कामा नये, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने शनिवारी काढला. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनाच विभागाने जारी केल्या आहेत.

सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेटी बसवावी, शाळेच्या आवारात आणि प्रवेश द्वारावर, तसेच बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ पुरेसे सीसीटीव्ही बसवावेत, शाळेत जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठीच्या दरवाजावर पुरुष अथवा महिला सुरक्षा रक्षक नेमावा, मुलांची उपस्थिती सकाळी, दुपारी व शाळा सुटण्याच्या वेळी घ्यावी आणि गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसने माहिती द्यावी, असे विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा समावेश असलेली दक्षता समिती नेमावी आणि पालक समितीसोबत चर्चासत्र घ्यावे, विद्यार्थी मानसिक दबावाला बळी पडू नयेत, म्हणून व्यवस्थापनाने शाळेतच समुपदेशनाची व्यवस्था करावी, स्कूल बसमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस बसण्याची अनुमती नसावी, बसचालकांनी विद्यार्थ्यांना इच्छित स्थळीच पोहोचवावे, बसमधून प्रवास करणाऱ्या शेवटच्या मुलीला घराजवळ सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका वा शिक्षिका असावी, शाळेतील मुली शालेय उपक्रम, स्पर्धेसाठी शाळेबाहेर जात असताना, त्यांच्याबरोबर महिला शिक्षक वा सेविका द्याव्यात, मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविकांची सुविधा असावी, तसेच शिक्षक व कर्मचाºयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक वा कर्मचारी नेमताना शाळा व्यवस्थापनाने शाळा व्यवस्थापनाने त्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून घ्यावे, आकस्मिक प्रकरणी मुलांचे पालक किंवा नातेवाईक शाळेत उपस्थित होईपर्यंत मुख्याध्यापकांनी मुलांचा ताबा शक्यतो महिला शिक्षकाकडे द्यावा, असे बजावण्यात आले आहे.
चिराग अ‍ॅपची माहिती द्या़
विद्यार्थ्यांवर होणाºया अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत पोक्सो इ-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती, तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘चिराग’ या अ‍ॅपची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी सूचना फलक शाळेत लावावेत.
त्यावर तक्रार नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. बालकांविरुद्ध होणाºया लैंगिक अपराधाबाबत माहिती असणाºया व्यक्तीने त्याबाबत तत्काळ विशेष किशोर पोलीस पथकास (स्पेशल ज्युवेनाइल पोलीस युनिट) अथवा संबंधित पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा


अहमदनगर - लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केले यांनी आज आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तीनही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय सामूहिक बलात्कार, कट करण्यासह अन्य एका गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील मंदिर मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. पीडित मुलीच्या आई-वडिलांसह गावकरी तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.


लोणीमावळा तालूका पारनेर येथे 22 आॅगस्ट 2014 रोजी शाळकरी मुलीचा तिघांनी बलात्कार करून खून केला होता. निघृण पद्धतीने शाळकरी मुलीचा खून झालेला असतानाही हा खटला सुरुवातीच्या काळात आरसा गाजला नाही. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर  2014 रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले तर 1 जुलै 2015 पासून सुनावणी सुरू झाली. 7 जुलै 2017 रोजी सुनावणी संपली. 

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी जे कही साक्षीदार नव्हता मात्र निकम यांनी 24 परिस्थितीजन्य, पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर,  मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवले. दोन दिवसांपूर्वी आरोपी व सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद झाल्यानंतर आज निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. आज सकाळी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा पत्राचे वाचन करण्यात आले. हत्येचा कट करणे,  सामूहिक बलात्कार या प्रकारामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच खून आणि अत्याचार या प्रकरणांमध्ये तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी करून वसूल करण्यात येणाऱ्या दंडा पैकी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाला दिली जाणार असून पन्नास हजार रुपये सरकारी जमा होणार आहे याशिवाय माध्यमातून होणारी रक्कम ही सरकारी जमा होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह आरोपीचे वकील अॅड. राहुल देशमुख, अॅड. अनिल आरोटे, आणि अॅड. परिमल फळे, यावेळी उपस्थित होते.