Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पुगलिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुगलिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून ०८, २०१८

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

Establishment of Workers' Union at Manikgad Cement Company | माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापनागडचांदूर/प्रतिनिधी:
कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कार्यालयाचे उद्घाटन नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले.स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सागर ठाकूरवार, कामगार नेते जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, साईनाथ बुचे, देवेंद्र गहलोत, वसंत मांढरे, अजय मानवटकर, अभय मुनोत आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, माणिकगड सिमेंट व्यवस्थापन गेल्या ३० वर्षांपासून कामगारांवर सतत अन्याय करीत आहे. सध्या येथे कार्यरत पाकेट युनियन कामगारांना न्याय देण्यास असमर्थ असल्याने नव्याने कामगार संघाची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. कामगारांनी एकसंघ होऊन अन्यायाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. सध्याची युनियन व्यवस्थापनच्या इशारावर चालत असल्याची टीकाही यावेळी केली.
कंपनीने कामगार कपात धोरण अवलंबताना कामगारांना नियमानुसार संपूर्ण लाभ दिला पाहिजे. मात्र कंपनीने २० वर्षे काम केलेल्या कामगारांना कामावरुन काढून टाकल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कामगार नेत्यांची भाषणे झाली. त्यांनी कामगारांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी कामगार संघाचे सहसचिव राजू बेले, उपाध्यक्ष रामरतन पांडे, कोषाध्यक्ष प्रकाश बुरडकर, दिनकर लांडे, राजकुमार छत्री, अनिता सिंग, सतीश येमचेलवार, हरी काळे आदी उपस्थित होते.
युनियन कार्यालयात वाचनालय होणार
युनियन कार्यालयामध्ये कामगारांच्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे नरेश पुगलिया यांनी कार्यक्रमात सांगितले.

शुक्रवार, जानेवारी २६, २०१८

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरून सुरु झालेल्या चंद्रपूर काँग्रेसच्या दोन गटातील वाद यंदा देखील कायम राहिल्याचे चित्र यंदाच्या २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात दिसून आला, चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण पुन्हा एकदा प्रशासनातील नायब तहसीलदारांनी केले आहे. 

शहरात वडेट्टीवार आणि पुगलिया असे दोन गट आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला हे दोन्ही गट चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण "आम्ही"करणार म्हणून आपापसात समोर आले होते, यात गेली सत्तर वर्ष सातत्यानं चंद्रपूरच्या गांधी चौकात जयस्तंभाजवळ काँग्रेसची अधिकृत झेंडावंदन रंपराच मोडीली गेली होती. 

 याच संदर्भात २४ जानेवारी २०१७ ला शहर पोलीस स्टेशन येथे वडेट्टीवार आणि पुगलिया या दोन्ही गटाची बैठक संध्याकाळी ६ वाजता बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीस पुगलिया गटावतीने मनपा गटनेते डॉ. महाकुलकर ,अविनाश ठावरी,देवेंद बेले प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे,सुधाकरसिंग गौर,प्रशांत दानव उपस्थित होते.मात्र वडेट्टीवार गटाचे एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने दोन्ही गटात समन्वय होऊ शकला नाही.त्यामुळे पुगलिया गटाने आम्हाला ध्वजारोहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती , रात्री ९ वाजताच्या सुमारास वडेट्टीवार गटाकडून नंदू नागरकर,सुनिता लोढिया,मलक शाकिल, हे शहर पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. व नंदू नागरकर यांनी मी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष असल्याने आम्हालाच या गांधीचौक येथील प्रजासत्ताक दिनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. 

या दोन्ही गटात समन्वय नसल्याने याठिकाणी कोणत्याही एका गटाला परवानगी देणे पोलीस प्रशासनाला शक्य नव्हते. व त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकत होता ,यातच चंद्रपूर उपविभागीय दंडाधिकारी मनोहर वसंत गव्हाळ यांनी आदेश देत उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे नायब तहसीलदार प्रमोद कुलटे यांना ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली.तर शहर पोलीस निरीक्षक यांना ध्वजारोहणासाठी योग्यता व्यस्था करण्याचे आदेश दिले.या आदेशांनंतर देखील कोणताही अनुचित प्रकार जर त्याठिकाणी घडला तर भारतीय दंड संहितेच्या सलाम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेशही काढण्यात आले होते. 

स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी खरंतरं सारे रागलोभ दुरावे विसरून एकत्र येण्याचा दिवस असतो. मात्र चंद्रपूर काँग्रेसच्या नेत्यांना मात्र तसं काही वाटत नाही असे या उदाहरणावरून लक्षात येत . कारण ध्वजारोहण कुणी करायचं या वादात अडकलेल्या वडेट्टीवार आणि पुगलिया गटांनी काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा मोडीत काढल्याने या नंतर देखील गांधीं चौकातील ध्वजारोहण हे प्रशासनाच्या मध्यस्तीनेच होणार हे मात्र नक्की झाले आहे. 






सोमवार, नोव्हेंबर ०६, २०१७

जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली

जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली


चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन 
एकाच दिवशी वड्डेटीवार- पुगलिया गटाचे वेगवेगळे मेळावे
 चंद्रपूर/ प्रतिनिधी : (ललित लांजेवार)
काँग्रेसचा नागपूर विभागीय जनआक्रोश मेळावा आज चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आला होता.  मात्र त्याचवेळी कांग्रेसचे जेष्ट नेते माजी खासदार नरेश पुगलियांनी त्याच शहरात दुसरा समांतर मेळावा आणि रॅली आयोजित केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली मांडून चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन करण्यात आले.


भाजप सरकार सत्तेत आल्यापासून मागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली. महागाईने तर कळस गाठला. या परिस्थितीत जनतेला जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारला त्रासुन गेली आहे. त्यांच्या मनात कमालीचा आक्रोश दिसत आहे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जल आक्रोश मिळवला संबोधन सांगितले.
राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने चंद्रपुरात काढलेल्या जनआक्रोश मेळाव्याला जनतेने चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश मेळाव्यात दिसून आला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके उपस्थित होते.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश मेळाव्याला अशोक चव्हाण विरोधकांनी मात्र दांडी मारली.या गटाचे नेतृत्त्व नरेश पुगलिया यांनी केले होते.
विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा विभागीय शेतकरी मेळावा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने दुपारी २ वाजता दाताळा मार्गावरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या पटांगणात नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आधी काँग्रेस कार्यकर्त्याकडून शहरभर रॅली मिरवण्यात आली या रॅलीत देखील हजारोच्या संख्येने नागरिक केंद्र व राज्य शासनाविरोधात आपला संताप व्यक्त करायसाठी जमले होते. पुगलिया यांच्या मिळाव्यात नागपूरचे माजी मंत्री नितीन राऊत, आमदार सुनील केदार ,अनिस अहमद ,सतीश चतुर्वेदी, यासह काँग्रेसचे आजी माजी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
या भाजप सरकारच्या काळात कर्जबाजारीपण शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली तर दुसरीकडे पुगलिया यांनी बाहेरून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोलादेत वडेट्टीवारांना आव्हान केले.
खरतर चंद्रपुरात होणाऱ्या या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण चंद्रपूर जिल्ह्यात केंद्रातील आणि राज्यातील मुख्यमंत्रीपद असणारे मंत्रीदेखील आहेत.  त्यामुळे सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेस पक्षाने सध्या एकजुटीने येणे गरजेचे होते.  मात्र तसे न होता एकाच पक्षात दुफळी पाहायला मिळाली.

*****वडेट्टीवारांचे शक्तिप्रदर्शन******
जनआक्रोश मेळाव्यासाठी मागील काही दिवसांपासून आ. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. चांदा क्लब गाऊंडवर मोठा पेंडाल उभारण्यात आला आहे.मेळाव्यात ५० हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता असल्याने कुणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. तशा सूचनाही प्रत्येक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. चांदा क्लब गाऊंडवर ५० हजार नागरिक बसतील, अशी व्यवस्था केली आहे.

******जनतेतही दिसला आक्रोश-*******
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चंद्रपूर शहरात असतानाच जिल्ह्यातील काँग्रेसचे २ गट पडले आहे.एकेकाळी कांग्रेसचा बालेकिल्ला असलेला चंद्रपूर जिल्हा आहे .सध्या या शहरात कांग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागल्याचं चित्र आज आयोजित मेळाव्यात व रॅलीच्या माध्यमातून दिसून आले.
एकाच दिवशी 2 वेगवेगळे मेळावे रॅली आयोजित करण्यात आलेले होते यात एकाच पक्षाचे वेगवेगळे गट तयार होऊन काँग्रेस पक्षातली दुफळी पहायला मिळाली. एकूणच काँग्रेसची जन आक्रोश सभा असली तरी पक्षांतर्गत आक्रोश उफाळून आल्याचं चित्र असून कार्यकर्त्यांची मात्र गोची झाल्याचे

*****पोलिसांचा तगडा बंदोबस्त******
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे मेळावे होत असल्याने सोमवारी शहरात कार्यकर्ते व नागरिकांची अलोट गर्दी उसळण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शहरात तगदा बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही कार्यक्रमस्थळी सोमवारी सकाळपासूनच दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. याशिवाय शहरात चौकाचौकात देखील पोलीस तैनात करण्यात यायले होते. प्रत्येक बारिकसारिक गोष्टींवर पोलिस विभागातील गुप्त विभाग करडी नजर ठेऊन होते,