Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी


Image result for शाळेत चोरी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील  सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांचे अज्ञात चोरट्यांनी  कुलूप तोडून साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ ऑगस्टच्या रात्री हि घटना घडली. या आधीसुद्धा १३ ऑगस्टच्या रात्री अरहेर-नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलुप तोडून दोन आलमाऱ्या फोडल्याची घटना घडली होती.हि घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनांमुळे चोरट्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळविल्याचे समजते.
             मिळालेल्या माहिती नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये २२ ऑगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. ह्या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यातील सुरबोडी शाळेमधून चोरट्यांनी मॉनिटर व प्रोजेक्टर असे अंदाजे ३५,००० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले तर दुसऱ्या घटनेत नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळेमधून एम्प्लिफायर,माईक,पेनड्राईव्ह व सिपी असे साहित्य चोरीला गेले.याबाबत दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

गुरुवार, जून २८, २०१८

वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास

वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास

Brave theft in the city | शहरात धाडसी चोरीवर्धा/प्रतिनिधी:
 शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!
माजी जि.प. सदस्य अमित विजयसिंग ठाकूर हे दोन महिन्यांपासून स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या धोंगडे यांच्या घरी किरायाणे राहत आहे. अमित ठाकूर हे कुटुंबीयांसह गोवा येथे फिरायला गेले असता चोरट्याने त्यांच्या कुलूप बंद घरात प्रवेश करून घरातील आलमारीतून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल्याचे सांगण्यात आले. बुधवारी गोवा येथून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दुसरी घटना शहरातीलच हिंदनगर येथे घडली. तेथील रमेश गुलाब गजभिये (६१) हे कुटुंबीयांसह कर्करोगग्रस्त असलेल्या बहिणीला अमरावती येथे भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, गजभीये यांच्या कुलूप बंद घरात चोरट्याने प्रवेश करून रोख १७ हजार रुपये, एक महागडा कॅमेरा तसेच सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.
दोन्ही प्रकरणात रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
चोरीनंतर आलमारी केली व्यवस्थित बंद
माजी जि.प. सदस्य अमित ठाकूर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने ज्या लोखंडी आलमारीतून सोन्याचा ऐवज लांबविला, त्याच आलमारीत वरच्या कप्प्यात चांदीचे साहित्यही होते; पण चोरट्याने त्याला हातही लावला नाही. शिवाय ज्या आलमारीतून सदर मुद्देमाल चोरून नेला, ती आलमारी चोरट्याने काम फत्ते केल्यानंतर व्यवस्थित बंद करून ठेवली होती. यामुळे चोरटाही तज्ज्ञच होता काय, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. तत्सम चर्चाही रामनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांमध्ये सुरू होती.
श्वानपथक ठरले अपयशी
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या घरांची बारकारईने पाहणी केल्यानंतर चोरट्यांबाबतचा थोडातरी सुगावा लागावा या हेतूने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने तब्बल तासभर दोन्ही घटनास्थळी चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात आले.

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

चोरी साठी इमेज परिणाम
सिंदेवाही/प्रतिनिधी:
 तळोधी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि सिंदेवाही येथील रहिवासी असलेले पोलीस हवालदार यांच्या घरी कोणी नसल्याने  संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला यात ९२ हजार ४०० रुपयाचा सोने,व यासह चांदीचा ऐवज लंपास केला.या प्रकरणात  सिंदेवाही पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदेवाही येथील कॉलनी परिसरात राहत असलेले जनार्दन मांदाळे यांचे घरी कुणी नसल्याने चोरट्यांनी भरदुपारी  दोन वाजताच्या सुमारास दरवाज्याचा ताला तोडला व  दिवानात ठेवलेल्या सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचा करंडा, लक्ष्मीची मुर्ति यासह किरकोड मौल्यवान वस्तूनसह एकूण  ९२ हजार ४०० रुपयाचा ऐवज चोरला .
     कुटुंबिय काही वेळानंतर घरी आल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी सिंदेवाही पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली  असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे पोलीसाच्याच घरी झाल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली

नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली

नवी मुंबई : नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

रविवार, नोव्हेंबर १२, २०१७

चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त

चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त

चंद्रपूर:(ललित लांजेवार)
 शहरात घरफोडी होते ह्या घरफोडीची तक्रार पोलिसात केली जाते. मात्र पोलिस दादा हे घटनास्थळी लवकर पोहोचत नाही असा अनुभव नागरिकांना बराच वेळा वेगवेगड्या माध्यमातून येतो. असाच अनुभव चंद्रपुरात रामनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात फिर्यादीला व चंद्रपूरच्या जनतेला आला आहे.

शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या रामनगर परिसरातील  श्री. अरुण चिंतलवार यांच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली. या घरफोडीत अरुण चिंतलवार
यांच्या घरून दहा हजार रुपये रोख व दोन हजार रुपये चिल्लर त्याच सोबत महत्वपूर्ण सामानही चोरीला गेल.

चोरट्यांनी जेव्हा घर फोडलं तेव्हा चिंतलवार दाम्पत्य हे एका वैवाहिक कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. सकाळ होताच शेजारी राहणारे सुनील तिवारी यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती चिंतलवार दांपत्यास फोनवरून दिली मात्र अकोला- चंद्रपूर अंतर लांब असल्याने त्यांनी संध्याकाळपर्यंत पोहोचातोय असे फोनवरून तिवारी यांना कडविले. व घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. तिवारी यांनी या घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला फोन करून दिली, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात त्यांना घटनास्थळावर जाणे  बंधनकारक असते. पोलिस स्टेशन ते घटनास्थळ हे अंतर जवळपास अडीच किमी. मात्र घटनेच्या 50 मिनिटानंतरही पोलिस घटनास्थळी दाखल झाली नव्हती. त्यामुळे शेजारी तक्रारदार पोलिसांची वाट पाहत घटनास्थळी बराच वेळ होते. घटनेचा 50 मिनिटांनीही पोलीस घटनास्थळावर दाखल झाली नाही हे बघून तिवारी यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार जी.बी.गोटमारे यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याचाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परत फोन रामनगर पोलिसांना करण्यात आला. मात्र त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे जे उत्तर होते ते सामान्य जनतेसाठी चीड़ निर्माण करणारे होते.

संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस दादांनी फोनवर घेऊन घेतली मात्र या घटनेला प्राधान्य न देता, या घटनेबद्दल गांभीर्य न जाणता त्यांनी सर्वात पहिले मुद्देमाल गेला आहे का? किंवा चोरीचा प्रकार  मोठा आहे की छोटा असा प्रश्न केला. इतका सर्व खटाटोप झाला असतानाही पोलिस स्टेशन पासून निव्वळ दोन ते अडीच किलोमीटर अंतर यासाठी पोलिसांना इतका खटाटोप का करावा लागला? असाही प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. यातही तक्रारकर्त्याने इतका वेळ घटनास्थळावर पोहोचण्यासाठी का होतोय अशी विचारणा केली असता पोलिसांनी फोनवरून उत्तर दिले 'सकाळची वेळ असल्याने पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी व कामात आहे त्यामुळे घटनास्थळावर कर्मचारी पोहोचून जाईल थोडा वेळ लागेल'.

चंद्रपुरातील रामनगर परिसर हा उच्चभ्रू वस्तीत मोडतो या वस्तीत शहरातील धनाढ्य व सुशिक्षित नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तक्रारदाराच्या सांगण्यावरून या परिसरात पोलीस कधीच गस्त घालत नाही असे निदर्शनास आले आहे. तक्रारदार हे कामानिमित्य  रात्रीचे दोन वाजेच्या दरम्यान घरी परततात तरीही पोलिसांची पेट्रोललिंग या प्रभागात कधीच दिसली नाही असे सांगण्यात येते. हा मार्ग म्हणजे शहराच्या बाहेर चहूबाजूंनी निघण्यासाठी सोईस्कर आहे. घुग्घुस- चंद्रपूर, घुग्घुस- नागपूर, घुग्गुस- राजुरा, आणि परत शहरात हा मार्ग येतो. त्यात हा मार्ग भामटे -भुरट्याना शहराबाहेर जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने चोरटे आपल्या संधीचा पुर्ण फायदा घेत असतात.त्यामुळे आता रामनगर पोलिसांना आपल्या हदीत गस्त घालन्याची गरज या निमित्याने निर्माण होत आहे

या संपूर्ण प्रकारात प्रश्न हा तक्रार करण्याचा किंवा घेण्याचा नसून पोलिसांवरील आक्षेपाचा देखील नाही.प्रश्न आहे तो पोलिसांनी दिलेल्या "असमाधानकारक उत्तरांचा" आहे.

त्यामुळे रामनगर पोलिसांच्या अशा बेजबाबदार प्रश्नांमुळे व लेटलतीफ पणामुळे नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवणार का ?असाच प्रश्न निर्माण होत आहे.या संपूर्ण प्रकरनावरुण वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा कर्मचार्‍यांना काय सबब देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.