Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मे ०५, २०२१

प्राचिन माण

प्राचिन माण

प्राचिन माण 
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3xNDK1p
माण हा सध्या सातारा जिल्ह्यातील प्रदेश आहे.माण या नावाचे कोणतेही गाव नाही पण माण नदीच्या नावावरून या प्रदेशाला "माण" हे नाव मिळाले.या माणचे बरेच एेतिहासिक संदर्भ मिळतात.सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्त सम्राटांचा पाठिंबा होता.राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त -विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (६ वे -७ वे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपला भाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली.बदामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय.
मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्या बरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेव चरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली.प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते. नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता. माण तालुक्यात अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर (महाराष्ट्राचे कुलदैवत), दहिवडी (श्री काशीपाते निलकंठ महाराज), जांभूळणी येथील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर मोही (श्री महालक्ष्मी मंदिर), भवानी आई मंदिर (मार्डी), गोंदवले (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), वारुगड, म्हसवड (श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर ) मलवडी (खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज), पांगरी (बिरोबा, सतोबा),बिजवडी  , कुलकजाई (सीताबाई मंदिर), किरकसल (श्री नाथ मंदिर), कुकुडवाड (महादेव मंदिर), मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. आसपास वारुळगड, महिमानगड व वर्धनगड हे काही किल्ले आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

प्राचिन माण

रविवार, मे ०२, २०२१

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध -जिंतीकर भोसले

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध -जिंतीकर भोसले

.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले  

सोलापूर करमाळा तालुक्यातील मौजे जिंतीगावची छत्रपतींची थोरली गादी

दि. २ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/336VCpT
जिंती,ता. करमाळा,जि सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या पेक्षा मोठे बंधू होते. त्यांचे नाव(थोरले) संभाजी असे होते. कनकगिरिच्या युध्दात शहाजीराजे सोबत लढताना त्यांचा मृत्यू झाला.यावेळी शहाजीराजे,संभाजी व अफजलखान हे सरदार विजापूर आदिलशहाच्या पदरी नोकरीत होते,कनकगिरिच्या युध्दात अफजलखानाने कपटाने थोरले संभाजी यांना ठार मारले व ते लढाईत धारातीर्थी पडले असा देखावा केला.पुढे याचा बदला छ शिवाजी महाराज यांनी घेतला हा भाग वेगळा.आपण जिंतीकर भोसले यांचेविषयी जाणुन घेत आहोत.छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या शाखेबरोबरंच तंजावरच्या भोसले घराण्याची देखील महाराष्ट्राला ओळख आहे. परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे थोरले बंधू थोरले संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अज्ञात आहे.याचे कारण म्हणजे हे थोरले संभाजीराजे अल्पवयातच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला/दिला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. मोठ-मोठया इतिहासाकारांनी देखीला या थोरले संभाजीराजे घराण्याचा परामर्ष घेतला नाही, बखरकारांनी अज्ञानातून जे चित्र रेखाटले त्यामुळे या घराण्याचा फारसा विचार झाला नसून, काही माहिती पुढे आली, तीदेखील चुकीची ठरली.            

हाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरले संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र,‘राधामाधवविलासचंपू’ कर्त्या जयरामने या थोरल्या संभाजीराजांचा उल्लेख ‘ युवराज संभाजीराजे’ असा केलेला आहे.मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत या थोरल्या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेखदेखील केलेला नाही; फक्त अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या थोरल्या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो.चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बकर, शेदगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप यामध्ये थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख आलेला आहे.याबरोबर बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजींना जिजाऊ पासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले.त्यापैकी थोरले शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे.फारसी साधनात बादशहानाम्यात थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. थोरल्या संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळातदेखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत व अज्ञाताचे हे गूढ वाढतंच जाते.एक्क्याण्णव कलमी बखरीत थोरल्यासंभाजीचा पुत्रौमाजी याचा उल्लेख एकदा आलेला आहे.याशिवाय अन्य बखरकारांनी थोरल्यासंभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही.
परमानंदाने देखील शिवभारतात थोरलेसंभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहा विषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे.शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो. बृहदीश्वर शिलालेखात थोरल्या संभाजीराजांचा पुत्र उमाजीचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे. त्याचबरोबर उमाजींचा पुत्र परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते.
याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजींचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट थोरल्या संभाजींचा पुत्र असा जरी नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ (म्हणजे शिवाजी राजांना) असा आलेला आहे.
बृहदीश्वर शिलालेखानुसार थोरल्या संभाजींना जयंतीबाई खेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते,उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे दत्तक पुत्र नव्हते हे जेधे शकावली मधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधे शकावली मध्ये उमाजींचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद मिळते.
शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती.ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो.
उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता.त्यांचा देखील एक हुकूम उपलब्ध आहे.मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.
उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.मराठी साधनात मात्र यांचे उल्लेख नाहीत.
उमाजी या एकाच थोरल्या संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला, त्यांची शाखा महाराष्ट्रार विस्तारली म्हणून त्याची काही माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते.थोरल्या संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई यांचेच दुसरे नाव मकाऊ होते असा *गैरसमज* काही इतिहासकारांच्या लेखनामुळे रुढ झालेला आहे.
ऐतिहासिक वंशावळी मध्ये देखील मकाऊ या थोरल्या संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो.
ही वंशावळ इनाम कनिशन पुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तवात गोष्ट अशी की, जयंतीबाई या विवाहानंतर थोरल्या संभाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात कोलारप्रांती गेल्या त्या अखेरपर्यंत तिकडेच होत्या.
थोरल्या संभाजीराजांच्या मृत्यु नंतर देखील कोलार तालुक्यात जयंतीबाईंनी केलेल्या दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात.
जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा इ.स.१६९३ चा आहे. म्हणजेच जयंतीबाई या १६९३ पर्यंत हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे ठामपणाने सांगता येते.
दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात.
त्यांची समाधी देखील जिंती या गावी आहे. यावरून जयंतीबाई व मकाऊ या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते
सासू आणि सून यांची बखरकारांनी गल्लत केलेली आहे. मकाऊ या थोरलेसंभाजीराजे यांचे पुत्र उमाजी भोसले याचीं पत्नी होत्या. यांस बहादूरजी नावाचा पुत्र होता,
परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी हा दत्तक घेतला.
हे परसोजी म्हणजे शहाजीराजांचे चुलतभाऊ परसोजी यांचा पणतू, यांच्यापासून जिंतीकर बोसले घराण्याचा वंश पुढे वाढला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या वंशाचा इतिहास असा आहे. भोसले घराण्याची जी पाटीलकीची गावे वंश परंपरागत आलेली होती त्यापैकी जिंती हे एक होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. नात्याने मकुबाई शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या, त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागद पत्रांतून वारंवार दृष्टीस पडतो.
शाहूनी वेळोवेळी आपल्या या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसते.मकाऊस काही अडचण आल्यास ती निवारण करण्याचे आदेश शाहूनीे आपल्या कमाविस दारास दिलेले दिसतात. शाहूछत्रपती मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामांनी मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते.
इ.स.१७३० च्या सुमारास मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला.
त्या वेळी बादशहाने निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले

इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आपल्याया आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचल्या.
आज जिंती गावात त्यांचा उल्लेख मकाई असा केला हातो. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी त्यांची जत्रा भरते.
थोरले संभाजीराजे सोलापूर, पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या जिंती गावात आजही मकाऊचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे,त्यात थोरल्या संभाजीराजांच्या या शाखेचे विद्यमान वंशज राहतात.
वाडयाच्या तटाची बरीच पडझड झालेली आहे, परंतु सतराव्या शतकातील वैशिष्टये दाखविणारे महाद्वार अजून चांगल्या अवस्थेत आहे.

चिरेबंदी असणार्याय या महाद्वारावर वरच्या बाजूल लाकडातंच सुबक अशी गणेशपट्टी कोरलेली आहे. या मधील गजानन हा ऋद्धीसिद्धी सहित असून उजव्या सोंडेचा आहे. बाजूला दोन्हीकडे सुबक अशी वेलबुट्टी कोरलेली आहे. गणेशपट्टीच्या वर असणारा भाग हा पातळ विटांत बांधलेला असून विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे.
वाडयाच्या अंतर्भागात मोठी पडझड झालेली असून आतील सर्व बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. वाडयाच्या खालच्या भागात असणारे भुयार मात्र अगदी चांगल्या अवस्थेत आहे. याची उंची साधारणत: सात-साडेसात फूट एवढी आहे. याचे बांधकाम अगदी चिरेबंदी असे आहे. यात आत उतरण्यास दोन्ही बाजूंनी जिने आहेत. या भुयाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले असून त्यामध्ये खजिन्यासाठी रांजण बसविलेले आहेत.
जिंती गावच्या शेजारी एका चौथार्याचवर या गावची पाटलीण मकूबाई भोसले जिंतीकर उपाख्य मकाईची एक छोटेखानी अशी समाधी आहे.
एवढीच आज या गावात मकाऊची स्मृती आहे.
गावातले आणि आसपासची काही बांधकामे सतराव्या शतकाची वैशिष्टये बाळगून आहेत.
मराठयांच्या इतिसात जिंती गाव आणि जिंतीकर भोसले घराणे यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
श्रीशिवछत्रपतींचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. कर्नाटकात शहाजीराजांचे व त्यांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते,
परंतु काळओघात महाराष्ट्रात ही शाखा असूनदेखील ती आज अशी अज्ञातात आहे.
जिंती गावात आजदेखील मकाऊसाहेबांचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे. वाड्याच्या तटाची बरीच पडझड झाली आहे. परंतु १७व्या शतकातील वैशिष्ट्ये दाखवणारा महाद्वार अजून देखील चांगल्या अवस्थेत आहे. थोरल्या संभाजी महाराजांचे सध्याचे वंशज 'राजेभोसले' ह्या वाड्यात राहतात.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

गुरुवार, एप्रिल २९, २०२१

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा  


दि. २९ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3gNDfyg
ही गोष्ट कदाचित तुमच्या ही कानी पडली असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अहमदनगर मधील ‘शाह शरीफ’ दर्ग्याशी संबंध आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा संबंध…!छत्रपती शिवाजी महाराजांची जी वंशावळ उपलब्ध आहे ती सुरु होते बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांचा जन्म १५३३ सालचा. त्यांनामालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे.      

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा
        

आता हा प्रश्न अनेकांना पडतो की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये मुसलमानीनावांचा प्रभाव डोकावतो. असे का?तर या मागे एक कथा सांगितली जाते.त्याचं झालं असं की, मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा अहमदनगर मधील शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानी आली. या दर्ग्यात जे काही चांगल्या मनाने मागालं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती. त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस म्हटला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला ‘तुझे’ नाव देईन असा शब्द दिला.  पण पुढे मालोजींना दोन पुत्र झाले. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील ‘शाह’ या शब्दावरून एका मुलाचे नाव ‘शहाजी’ ठेवले आणि ‘शरीफ’ या शब्दावरून दुसऱ्या मुलाचे ‘शरीफजी’ असे नामकरण केले. तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा सुरु केली.
पुढे जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, तेव्हा नगरात असताना एके दिवशी सकाळी ही नौबत त्याच्याकानी पडली. आपल्या धर्मासमोर काफिरांचे वाद्य वाजवणे पाहून त्याला चीड आली त्याने ती नौबत बंद करवली. त्यानंतर शाह शरीफ यांनी औरंगजेबाच्या स्वप्नात जाऊन ‘तू माझी नौबत बंद करवलीस आतामी तुझी नौबत बंद करतो’ असे सांगितले आणि नंतर अहमदनगर मध्ये असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला. अशी कथा स्थानिकांनध्ये प्रचलित आहे.आजही अहमदनगर मध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे. आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी येथे दर्शनासाठी येतात.तर या दर्ग्याच्या आशीर्वादाने मालोजी राजेंना झालेला शरीफजी हा पुत्र देखील शूर निपजला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

बुधवार, एप्रिल २८, २०२१

बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

 बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते 

फेसबुक लिंक http://bit.ly/3nu3Ph6
१७३७ डिसेंबरचा मध्य चिमाची आपांचे शाहू महाराजांना पत्र आले -
"रायाची पत्रे ४ रमजानची (१६ डिसेंबर) आली. नबाब (निजाम) भूपाळगडी कोंडला आहे. दाणावैरण बंद. असा समय त्यास कधी घडला नाही. अतिसंकटी पडला आहे. त्याचे साहीत्यास औरंगाबादची फौज येणार ती तिकडे गोवून पडावी म्हणजे नबाबाचा पाडाव ऊत्तम होतो. ३ रमजानी एक युद्ध झाले. दुसरे कालही एक जाले. बरासा तमाशा नबाबाने पाहीला. महाराजांचे प्रतापे नबाबावर सलाबत चढली. करोलचा मारा देत आहो. मोगलांचा आरगानरगा (पूर्ण वेढा) केला आहे. दाणा, गल्ला, वैरण, काडी कूल बाद झाली आहे. बंगसाचीच गत यास जाली आहे. स्वामींच्या आशिर्वादे निजाम या ठिकाणी बुडत आहे. अगर सुटका झाली तरी उत्तमच होईल. किल्लेबंद झाल्यामुळे अब्रू राहीली नाही.
"
आधी फेब्रुवारी १७२९ मध्ये पालखेडवरती निजामाला धूळ चारली. तब्बल १० वर्षांनी पुन्हा निजामाला जेरबंद करुन त्याची अब्रू घालवली. निजाम बुडला तरी ठिक नाही बुडला तर त्याची जीवघेणी मानखंडना झाली आहे असे चिमाजी अप्पा म्हणतात. तब्बल तीन आठवडे निजामाचा कोंडमारा केला. निजामाच्या सैन्याला भोपाळच्या किल्यात आश्रय घ्यावा लागला. निजामा जवळ तोफा होत्या आणि भोपाळ तलावाचे नाले दरम्यान होते म्हणून मराठे जास्त सलगी करु शकत नव्हते. अन्यथा निजामाचा बेडा पार व्हायचाच. जवळचे धान्य संपल्याने निजामाच्या सैन्याने चक्क जनावरे फाडून खायला सुरुवात केली. निजामाच्या सैन्याचे ठिक होते पण बाजीरावांविरुद्ध निजामाच्या मदतीला आलेले रजपूत शाकाहारी अन्नाविना उपाशी तडफडू लागले. दुर्बुद्धी झाली आणि निजामाच्या कच्छपी लागलो असे त्यांना वाटू लागले. अखेर ७ जानेवारी रोजी अपमानास्पद तहा वरती स्वाक्षर्‍या करुन निजामाला सुटका करुन घ्यावी लागली.
बाजीरावांना थोडे अधिकचे आयुष्य मिळाले असते तर कदाचित अटकेवरील झेंडे त्यांच्याच कारकिर्दित बघायला मिळाले असते. २८ एप्रिल १७४०, मध्य प्रदेशात खरगोण जिल्ह्यातील नर्मदा काठावरील रावेरखेडीे येथे उष्माघातामुळे आजारी पडून बाजीरावांचा मृत्यु झाला. आज त्यांची २७६वी पुण्यतीथी.Ⓜ


बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

छ. शिवाजी महाराजांचे चित्र

छ. शिवाजी महाराजांचे चित्र

छ. शिवाजी महाराजांचे चित्र 


फेसबुक लिंक http://bit.ly/3u0W4BN
सदर चित्र हे थोर इतिहास संशोधक आणि संपादक, द. ब. पारसनिसांचे सहकारी आणि ऐतिहासिक वस्तुंचे संग्राहक पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्या संग्रहातील असून मूळ चित्र मावजींच्या सातारा येथील संग्रहात होते. पुढे मावजींनी ते मुंबईच्या तत्कालीन 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम' अथवा सध्याच्या 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'ला भेट म्हणून दिले.
काही वर्षापूर्वीपर्यंत सदर चित्र हे दर्शनी पहावयास ठेवले होते. परंतू या चित्राच्या सद्य स्थितीतील अवस्थेतून पुनर्जिवित करण्याच्या हेतूने ते सध्या प्रदर्शनास नाही. सदर चित्राच्या कॉपीज्‌ संग्रहालयाच्या विक्रिकक्षात मूल्य रु ५० ला विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
सदर चित्र दख्खनी चित्रशैलीतील असून महाराजांच्या उजव्या हातात फिरंग / धोप जातीची सरळ पात्याची तलवार आणि डाव्या हातात पट्टा आहे. कमारेला शेल्यात कट्यार खोवलेली असून वर्ण सावळा दाखवला आहे. एकंदरित चित्रशैली पाहताना हे चित्र समकालीन असण्याची दाट शक्यता आहे. चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही. चित्रकाराने आपली जान चित्रात आोतलेली असुन सर्वांगसुंदर हे चित्र आहे.

छ. शिवाजी महाराजांचे चित्र