Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०८, २०२३

यासाठी गेले उतरले नदीत; 11 वर्षांच्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू



प्रतिक, निर्दाेष, बन्नी यांच्यासह चांदेकर नामक हे चौघे बालक सकाळी शाळा संपल्यानंतर दुपारी खेकडे पकडण्यासाठी वर्धा नदीपात्रावर गेले होते. त्यानंतर प्रतिक, निर्दाेष, बन्नी हे तिघेही पाण्यात उतरले मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. या मित्रांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला.

शाळा सुटल्यानंतर वर्धा नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तीन शाळकरी मित्रांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे शनिवारी दुपारी घडली. प्रतिक नेताजी जुनघरे (११), निर्दाेष ईश्वर रंगारी (११), बन्नी सुरेश रायपुरे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.

ही घटना बाहेर उभ्या असलेल्या चांदेकर नामक बालकाच्या लक्षात येताच त्यांने भीतीपोटे थेट गाव गाठत घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर संपूर्ण गाव वर्धा नदीपात्राजवळ जमा झाले. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस बालकांचा शोध घेत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.