Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २३, २०२१

रेणापूर तालुक्यातील कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.


 
लातूर - रेणापूर तालुक्यातील कामखेडा ग्रामपंचायतीतील गैर कारभाराबद्धल गावातील नागरिकांतून 13,14,15 व्या वित्त आयोग निधीतून केलेल्या कामाची चौकशी करावी अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन  गावकर्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे. 
मनरेगा ,दलित वस्तीतील काम इतर ठिकाणी केल्याबद्दल, नाली सफाई न करताच रक्कम उचलून घेऊन खर्च करण्यात आले, नविन नळ योजनेच्या नावाखाली भरमसाठ अनामत रक्कम पाणी पट्टी गोळा करणे ,गावातून जाणार्या वाहतूकदाराकडून अवैध रक्कम गोळा करणे ,ग्रामपंचायतीचे बॅंक खात्यात रक्कमेची चौकशी,ग्रामपंचायतीचे ऑडीट,तसंच फक्त मर्जीतील व्यक्तीनांच शासनाच्या विविध लाभ व विहीरी देणे अशा अनेक संशयास्पद कारभाराबद्धल नागरिकांतून संशय बळावल्याने धरणे अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भुजंगराव पाटील, गोविंद सुर्यवंशी,राजेसाहेब सूर्यवंशी, अंगद पाटील, गोपाळराव सोमवंशी,योगेश सातपुते,सिद्राम जोगदंड, भीमराव औसेकर, नागनाथ धावने,नागनाथ कसमळे,लहु सोमवंशी सह शंभर जनांच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.