Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २४, २०२१

1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू Ø आतापर्यंत 35,712 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,646

1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

Ø आतापर्यंत 35,712 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,646


चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 712 झाली आहे. सध्या 14 हजार 646 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 53 हजार 72 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 95 हजार 807 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 45 व 39 वर्षीय पुरुष, भिवापुर येथील 67 वर्षीय महिला, गोपाल पुरी येथील 61 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 38 व 53 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 58 व 78 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, सरदार पटेल वार्ड येथील 64 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय महिला .नागभीड तालुक्‍यातील 55 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 43 वर्षीय महिला 65‌ व 70 वर्षीय, सावरगाव येथील 36 वर्षीय पुरुष. लाखांदूर येथील 65 वर्षीय महिला.बल्लारपूर येथील 80 वर्षीय पुरुष.भद्रावती येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 754 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 696, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 25, यवतमाळ 22, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1618 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 587, चंद्रपूर तालुका 140, बल्लारपूर 101, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 106, नागभिड 77, सिंदेवाही 19, मूल 30, सावली 32, पोंभूर्णा 37, गोंडपिपरी 12, राजूरा 36, चिमूर 50, वरोरा 172, कोरपना 89, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.


नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.